शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

अपूर्ण कामांमुळेच अपघात

By admin | Updated: May 24, 2016 06:07 IST

बीआरटी मार्गात घुसणारे वाहनचालक, अपूर्ण कामे यांमुळेच नगर रस्ता बीआरटी मार्गावर अपघात होत असल्याचा खुलासा प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी केला. अपघातांच्या कारणावरून

पुणे : बीआरटी मार्गात घुसणारे वाहनचालक, अपूर्ण कामे यांमुळेच नगर रस्ता बीआरटी मार्गावर अपघात होत असल्याचा खुलासा प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी केला. अपघातांच्या कारणावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न सोमवारच्या सर्वसाधारण सभेत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, मनसेने केला; मात्र महापौर तसेच राष्ट्रवादीचे सभागृह नेते ठाम राहिल्यामुळे तो फसला. अपूर्ण कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा मार्ग बंद करावा, अशी मागणी शिवसेना, भाजपा, काँग्रेस, मनसेचे सदस्य करीत होते; पण महापौर प्रशांत जगताप यांनी प्रशासनाचा आधार घेऊन या मागणीतील हवा काढली. पीएमपीचे अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांच्या खुलाशाने अडचणीत येणार, अशी कल्पना असल्यामुळेच की काय; पण आयुक्त कुणाल कुमार सभागृहातून निघून गेले. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय सदस्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली व अपुऱ्या कामांचा खुलासा त्यांच्याकडेच मागावा, अशी मागणी केली. राष्ट्रवादीचे सुभाष जगताप यांनी तर आयुक्तांमुळेच नगरसेवक, पदाधिकारी विनाकारण बदनाम होत आहेत. तेच या अपघातांना जबाबदार आहेत, अशी टीका केली. मनसेचे बाळा शेडगे, वसंत मोरे, राजू पवार, किशोर शिंदे यांनी महापौरांवर निशाणा साधत त्यांच्या घाईमुळेच अपघात होत आहेत, असा आरोप केला. काँग्रेसचे अविनाश शिंदे यांनी प्रशासनाला सुनावतानाच महापौरांनाही तुम्हाला जबाबदारी टाळता येणार नाही, याची जाणीव करून दिली. भाजपच्या मुक्ता टिळक, अशोक येनपुरे, धनंजय जाधव यांनी बीआरटी मार्गच चुकीच्या पद्धतीने तयार गेला असल्याचे सांगितले. सेनेच्या पृथ्वीराज सुतार, संजय भोसले यांनी केलेली कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बीआरटी मार्ग बंद ठेवा, ही मागणीच नंतर सर्वांनी उचलून धरली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विशाल तांबे, सतीश म्हस्के, महेंद्र पटारे आदींनी चर्चेत भाग घेतला; मात्र सर्वपक्षांची टीका परतवून लावताना खरा किल्ला लढवला तो सभागृह नेते बंडू केमसे यांनी. सुरुवातीला आयुक्त कुणाल कुमार यांनी, तर नंतर कृष्णा यांनी खुलासा केला. महापौर जगताप यांनी अपघात बीआरटीमुळे होतात, हे म्हणणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. अपूर्ण कामे महिनाभरात पूर्ण होतील, असे आश्वासन प्रशासनाकडून सभागृहाला देऊन त्यांनी मार्ग बंद ठेवण्याची मागणी धुडकावली. जबाबदारी ढकलू नयेबहुसंख्य सदस्यांचा रोख या मार्गात सातत्याने होत असलेल्या अपघातांवरून सत्ताधारी राष्ट्रवादीला बदनाम करण्याचाच होता. भाजपाचे गणेश बीडकर, मनसेचे राजेंद्र वागसकर, सेनेचे अशोक हरणावळ यांनी तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका वृद्धाच्या बळीला या मार्गाचे घाईघाईने उद््घाटन करणारी राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी कृष्णा, आयुक्त कुणाल कपूर व महापौर या तिघांच्याही महापालिका व पीएमपीएलबरोबर आलेल्या संबंधांचा उल्लेख करून त्यामुळे आता कोणीही एकमेकांवर जबाबदारी ढकलू शकणार नाही, अशी टीका केली.