शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

लाच स्वीकारून बंधाऱ्यात सोडले पाणी?

By admin | Updated: May 6, 2017 01:59 IST

येथील परिसरातील ओढा, नवीन बंधाऱ्यात ग्रामपंचायतीच्या मागणीशिवाय खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री

लोकमत न्यूज नेटवर्कपारवडी : येथील परिसरातील ओढा, नवीन बंधाऱ्यात ग्रामपंचायतीच्या मागणीशिवाय खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा पाणी सोडले. ठराविक बड्या बागायतदारांकडून लाच घेऊन पाणी सोडल्याची चर्चा परिसरात आहे. या प्रकारची चौकशी करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत येथील ग्रामस्थ सचिन होले यांनी सांगितले की, माझा पाण्याअभावी तीन एकर ऊस जळून गेलेला आहे.  याबाबत आम्ही काही शेतकऱ्यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याची मागणी करूनदेखील शेतीला पाणी दिले नाही. मात्र, गावातील ओढ्यात पाणी का सोडले, याबाबत खडकवासला पाटबंधारे विभाग इंदापूर शाखेचे अभियंता के. के. देवकाते यांना संपर्क साधला असता, पारवडी ग्रामपंचायतीने पाणी सोडण्याची मागणी केल्यामुळे पाणी सोडल्याचे सांगितले. परंतु, पारवडीचे ग्रामसेवक शहानूर शेख यांनी आम्ही खडकवासला पाटबंधारे विभागात पाणी सोडण्याची मागणी केली नसल्याचे सांगून याबाबत मला काहीही माहीत नसल्याचे सांगितले. मागील आठवड्यापासून इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी तलावात खडकवासला कालव्याचे पाणी सोडण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले होते, तर दुसरीकडे याच कालव्यातील पाणी पारवडीच्या बंधाऱ्यात संबंधित विभागातील अधिकारी लाच स्वीकारत सोडत आहेत. याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.