शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

पावसाच्या हजेरीने राज्यात भातलावणीस वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पावसाने भातक्षेत्रात हजेरी लावल्याने रोपांच्या पुनर्लागवडीस राज्यात वेग आला आहे. पाऊस उशिरा सुरु झाल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पावसाने भातक्षेत्रात हजेरी लावल्याने रोपांच्या पुनर्लागवडीस राज्यात वेग आला आहे. पाऊस उशिरा सुरु झाल्याने भाताचे क्षेत्र कमी होण्याची चिन्हे असून लावणीही ऑगस्टपर्यंत चालेल असे दिसते आहे.

मागील आठवड्यापर्यंत पावसाने ओढ दिली होती. राज्यातील भाताचे क्षेत्र २ लाख ९६ हजार हेक्टर आहे. कोकण विभाग, तसेच पुणे विभाग तसेच भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यातही भात पीक घेतले जाते. पाऊस वेळेवर सुरु झाला असता तर जुलैअखेरपर्यंत भात लावणी पूर्ण होते. मात्र पाऊस लांबला व लावणी लांबणीवर पडली.

रोपवाटिकेतील भात रोपे काढावीत की न काढावीत या चिंतेत शेतकरी असतानाच पावसाने हजेरी लावली. कोकण तसेच अन्य भात क्षेत्रात पाऊस पडल्याने खाचरांमध्ये आता पाणी भरले आहे. त्यामुळे भात रोपांची पुनर्लागवड वेगात सुरु झाली आहे. रोपवाटिकेतून रोपे काढून ती खाचरात लावण्यात येत आहेत.

राज्यात एकूण ५० टक्केपेक्षा जास्त भात क्षेत्रात पेरणी झाली आहे. उशीरा सुरु झाल्याने आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लावणी सुरु राहील. राज्याचे भात क्षेत्र पावसाच्या विलंबामुळे साधारण ५ टक्के कमी होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातही ५० टक्के भातलावणी पुर्ण झाली आहे. जिल्ह्याचे एकूण भात क्षेत्र ६१ हजार हेक्टर आहे. मावळ, जुन्नर, खेड, वेल्हे, पुरंदरचा काही भाग इथे भात मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. या क्षेत्रातही आता रोपांच्या पुनर्लागवडीने वेग घेतला आहे.