शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

राज्यातील सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:14 IST

पुणे : राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणा-या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) येत्या ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करणा-यास मुदत देण्यात आली ...

पुणे : राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणा-या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) येत्या ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करणा-यास मुदत देण्यात आली असून डीएड, बीएड अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनासुद्धा टीईटी परीक्षा देता येईल, असा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे ३० ते ३५ हजार डी.एड., बी.एड. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक पात्रतेसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे बी.एड., डी.एड., पदवी उत्तीर्ण विद्यार्थी टीईटी परीक्षेसाठी अर्ज करत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शिक्षक भरती होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. डी.एड. अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या १५ हजारांच्या आत आली आहे. परंतु,शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याने शासनाने बी.एड., डी.एड. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या अभ्यासक्रमाचा अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

----------------------

टीईटी परीक्षेस अर्ज करण्याची मुदत दोन ते तीन वेळा वाढविण्यात आली. विद्यार्थ्यांना येत्या ५ सप्टेंबरपर्यंत या अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. राज्यातील डी.एड. अभ्यासक्रमाच्या १४ हजार ३६० विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. बी.एड. अभ्यासक्रमाच्यासुद्धा सुमारे १५ ते २० हजार विद्यार्थ्यांना या परीक्षेस प्रविष्ठ होता येईल.

--------------------------------------------

डीएड. पदवी घेतल्यानंतर शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे डी. एड. उत्तीर्ण झाल्यानंतर परीक्षेस प्रविष्ठ होण्यापेक्षा डी. एड. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षास असताना परीक्षेची संधी मिळत आहे. या संधीचा निश्चितच अनेक विद्यार्थी फायदा घेतील.

- प्रीती कावळे, विद्यार्थी

------------------