शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

खडकवासला प्रणालीत ९.६२ टक्के पाणी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2016 02:11 IST

खडकवासला धरण साखळीत अवघा ९.६२ टक्के (२.८0 टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी याच कालावधील तब्बल १५.३८ टक्के (४.४८ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक होता

पुणे : खडकवासला धरण साखळीत अवघा ९.६२ टक्के (२.८0 टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी याच कालावधील तब्बल १५.३८ टक्के (४.४८ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी असल्याने तसेच जून अखेरीस पालखी सोहळ्यासाठी पाणी सोडावे लागणार. जून महिन्यात पावसाला सुरूवात न झाल्यास पुणे शहरातील पाणीकपात वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेकडूनही कपातीबाबत विचार सुरू करण्यात आला असून, जून महिन्यातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण़्यात आले.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाणी पातळी मे अखेर अवघ्या ९.६२ टक्क्यांवर आली आहे. या प्रकल्पात चार पानशेत, खडकवासला, वरसगाव आणि टेमघर ही चार धरणे असून, या धरणांची एकूण क्षमता २९ टीएमसी आहे. या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील वर्षी जेमतेम पाऊस झाल्याने आॅक्टोबर २0१५ अखेर या धरणांमध्ये केवळ ५0 टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर पुणे शहर आणि जिल्ह्यातील गावांसाठी पाण्याचे नियोजन केल्यानंतर ३0 मे अखेर या पाणीसाठा २.८0 टीएमसीवर पोहोचलेला आहे. केवळ शहरासाठी पाणी राखीव ठेवल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या पूर्वीच जाहीर केले आहे. दरम्यान, पुणे शहरासाठी दरमहा १ टीएमसी पाण्याची आवश्यकता असून, हे पाणी राखीव ठेवल्यास जुलै अखेरपर्यंत हे पाणी शहरास पुरेल एवढे असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)