शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

कोरोना बळी कामगाराच्या वारसाला ९० टक्के वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना संसर्गाने निधन झालेल्या कामगाराच्या वारसाला दरमहा त्या कामगाराचे ९० टक्के वेतन दिले जाणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना संसर्गाने निधन झालेल्या कामगाराच्या वारसाला दरमहा त्या कामगाराचे ९० टक्के वेतन दिले जाणार आहे. राज्य कामगार विमा महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाची माहिती नसल्याने अनेक कामगारांचे वारसदार यापासून वंचित आहेत.

कोरोना बळी ठरलेल्या कामगाराच्या अंत्यविधीसाठीही १५ हजार रुपयांची विशेष मदत महामंडळाकडून दिली जात आहे. कोरोना उपचार सुरू असलेल्या कामगाराला दिवसाचे ७० टक्के वेतन तो कामावर नसतानाही मिळेल. एका वर्षात ९१ दिवस त्याला याचा लाभ घेता येणार आहे. मात्र, महामंडळ प्रशासनाकडून या माहितीचा प्रचार होत नाही. कामगार व मालकांच्या वेतनातून थेट कपात होत असल्याने महामंडळाकडे कोट्यवधी रुपये आहेत, मात्र प्रशासनाकडून त्याचा योग्य विनियोग होत नसल्याचे चित्र आहे.

दरमहा २१ हजारपेक्षा कमी वेतन व २० पेक्षा जास्त कामगार संख्या असलेल्या प्रत्येक कंपनीला आपल्या कामगारांची या कायद्यांतर्गत नोंद करावीच लागते. कामगारांच्या वेतनातून १.७५ टक्के व कंपनी मालकाकडून ४.७५ टक्के प्रमाणे दरमहा रक्कम जमा करावी लागते. केली नाही तर तो कायद्याने गुन्हा आहे. अनेक कंपन्या कायद्यातून पळवाट काढून नोंदणी करून घेणे टाळतात व त्यांना प्रशासनाकडून अभय दिले जाते.

चौकट

“कामगार हिताचे निर्णय होत असूनही त्याचा लाभ कामगारांना मिळत नसेल तर ते अयोग्य आहे. कंपन्या नोंदणी करत नसतील तर प्रशासनाने मोहीम राबवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. पात्र कामगारांंनी अधिक माहितीसाठी कामगार विमा महामंडळाच्या बिबवेवाडी कार्यालयाशी संपर्क साधावा.”

-सुनील शिंदे, संचालक, कामगार राज्य विमा महामंडळ, ईएसआयसी

चौकट

पंधरा लाख पात्र, अर्ज फक्त ८०

कामगार विमा महामंडळाच्या निर्णयांचा अपेक्षित प्रचार व प्रसार होत नसल्याने लाखो पात्र कामगार व त्यांचे वारसदार यापासून वंचित आहेत. माहितीच नसल्याने या निर्णयांचा लाभ घेण्यासाठी कोणी दावाच करायला येत नाही. महामंडळाच्या एकट्या पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत मिळून पात्र कामगारांची संख्या १५ लाख ३० हजार ८९० आहे. वारसदारांचे अर्ज मात्र या ५ जिल्ह्यांत मिळून फक्त ८० आहेत.