शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

शेततळ्यात विषारी आैषध टाकल्याने ७ टन माशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:14 IST

बाभुळगाव : पळसदेव (ता. इंदापूर) शेलार पट्टा येथील शेतजमीनीवर एक एकर क्षेत्रात मत्स्य तळ्यात विषारी औषध टाकल्याने ...

बाभुळगाव : पळसदेव (ता. इंदापूर) शेलार पट्टा येथील शेतजमीनीवर एक एकर क्षेत्रात मत्स्य तळ्यात विषारी औषध टाकल्याने रूपचंद जातीचे ६ ते ७ टन वजनाचे जिवंत मत्स्यबीज मेल्याने संबंधीत शेतकऱ्याचे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी संजय एकनाथ शेलार (वय ५२, रा. पळसदेव) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी सुरेश विश्वनाथ शेलार (रा. पळसदेव) यांच्यावर संशय व्यक्त केला जात असून तो शेलार यांचा चुलत भाऊ आहे. संजय शेलार आणि एकनाथ शेलार यांच्यात शेतजमिनीच्या कारणावरून वाद आहे. ६ आॅगस्टला सायंकाळी ४ च्या सुमारास सुरेश शेलावर व त्यांचे या व्यवसायातील सहकारी संतोष लक्ष्मण नगरे हे मत्स्यबीज तळ्याची पहाणी करण्यासाठी शेतात गेले. यावेळी सुरेश शेलार हे त्यांना आडवे गेले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. ७ ऑगस्टला सुरेश शेलार याने पुन्हा संतोष नगरे यांच्या घराजवळ जाऊन त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर ९ आॅगस्ट रोजी संतोष शेलार हे शेततळे पाहण्यासाठी गेले असता तळ्यातील सर्व मत्स्यबीज मृृृृतावस्थेत पाण्यावर तरंगताना दिसून आले. ही माहिती त्यांनी पोलीस पाटील यांना फोनवरून दिली. मासे मरण्याचे कारण तपासले असता विषारी औषध पाण्यात टाकल्याने मासे मृृत्युमुखी पडल्याचे समोर आले. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

फोटो : पळसदेव येथे शेत तळ्यात विषारी औषध टाकल्याने सहा ते सात टन मृत झालेले मत्स्यबीज.