शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

60 दिवस उलटले, तरी वितरिकेला आवर्तन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:11 IST

शेतकरी आक्रमक, स्वतः सोडणार पाणी लासुर्णे : 60 दिवस उलटले, तरी नीरा डावा कालव्यावरील 43 क्रमांकाच्या वितरिकेला पाणी सोडले ...

शेतकरी आक्रमक, स्वतः सोडणार पाणी

लासुर्णे : 60 दिवस उलटले, तरी नीरा डावा कालव्यावरील 43 क्रमांकाच्या वितरिकेला पाणी सोडले नसल्याने येथील लाभधारक शेतकरी हतबल झाले आहेत. उन्हाळी आवर्तन न मिळाल्याने पिके सुकून जाऊ लागली आहेत. जर 15 मेपर्यंत पाणी सोडले नाही, तर आम्ही सर्व शेतकरी 43 क्रमांकाच्या वितरिकेला पाणी सोडू, असे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहे.

दर वर्षी 43 क्रमांकाच्या वितरिकेच्या पाण्याचा प्रश्न उभा राहतो. वर्षभरात केवळ एकच आवर्तन पूर्ण क्षमतेने मिळाले. सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे. उन्हाळी आवर्तन न मिळाल्याने परिसरातील पिके जाळून जाऊ लागली आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार पाणी सोडण्याची विनंती केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच 5 मेला पाणी सोडू, असे आश्वासन देखील संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले होते. मात्र त्यानंतरही पाणी सोडले गेले नाही. याबाबत सोमवारी (दि. 10) येथील निळकंठेश्वर पाणी वापर संस्थेच्या वतीने पुणे येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंताना निवेदन देऊन शेतकरी स्वतः 15 मे रोजी वितरिकेला पाणी सोडतील असा इशारा देण्यात आला आहे.