शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ४१ लाखांची भरपाई मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:09 IST

सातगाव पठारावरील गावांत बटाटा हे प्रमुख पीक या भागांत मोठ्या प्रमाणावर दरवर्षी घेतले जाते. दरम्यान, मागील वर्षी सप्टेंबर २०२० ...

सातगाव पठारावरील गावांत बटाटा हे प्रमुख पीक या भागांत मोठ्या प्रमाणावर दरवर्षी घेतले जाते. दरम्यान, मागील वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये परिसरातील पेठ, कुरवंडी, थुगाव, पारगाव तर्फे खेड तसेच आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने बटाटा, फळबागांचे, शेतमालाचे अतोनात नुकसान झाले होते. काढलेला बटाटा देखील अरणीमध्येच सडल्याने शेतकरी पूर्ण अडचणीत सापडला होता. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पं. स. उपसभापती संतोष भोर, संतोष धुमाळ यांनी परिस्थितीची पाहणी दौरा केला होता. तसेच कृषी, महसूल, प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत पंचनामे देखील करून घेतले होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून रूपये ४१ लक्ष मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान, पारगाव तर्फे खेड येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होण्यास तांत्रिक अडचणी होत होत्या. याबाबत शेतकऱ्यांनी विवेक वळसे पाटील यांना भेटून अडचणी सांगितल्या असता त्यांनी तत्काळ आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांच्याशी संपर्क करून या अडचणी दूर करून दिल्या. खरीप हंगामाच्या तोंडावर या मदतीने बी-बियाणे खरेदी, शेती मशागत आदी कामांसाठी आर्थिक मदत उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.