शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

३१ लाख २० हजार विद्यार्थी परीक्षेविना पुढच्या वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:12 IST

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षाविना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नववी व अकरावीच्या ...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षाविना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा परीक्षा न घेता थेट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा राज्यातील सुमारे ३१ लाख २० हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.त्यामुळे पुढील वर्षी दहावी-बारावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असणार आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास करता येत नाही. तसेच नववीमध्ये सुद्धा एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास त्याची पुन्हा परीक्षा घेता येते. परंतु, अनेक शाळा दहावीचा निकाल चांगला लागावा, यासाठी अभ्यासक्रमात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना नापास करत असल्याचे दिसून आले आहे. अकरावीला सुद्धा नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे यावर्षी सर्वच विद्यार्थी थेट दहावी व बारावीत प्रवेश होऊ शकतात.

मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली. मागील आठवड्यापर्यंत अकरावीचे व प्रवेश सुरू होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अकरावीचा फारचचा अभ्यासक्रम शिकवून झालेला नाही. मात्र, नववीमध्ये दहावीच्या अभ्यासक्रमासाठी पूरक असणाऱ्या संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट होणे गरजेचे आहे. तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बारावीत जाण्यापूर्वी विज्ञान व वाणिज्य विषयातील काही संकल्पनांची माहिती होणे आवश्यक असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार नसल्या तरी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे महत्त्वाचे आहे, असे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

—---

राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात नववीच्या १७ लाख ९७ हजार ६५५ तर अकरावीच्या १३ लाख २२ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षातही साधारणपणे एवढ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील तब्बल ३१ लाख २० हजार ४१ विद्यार्थी थेट दहावी व बारावीच्या वर्गात गेले आहेत.

—----

राज्यातील प्रमुख शहरांमधील नववी व अकरावीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या आकडेवरी (वर्ष- २०१९-२०२०)

जिल्हा नववी अकरावी

मुंबई १,४०,८७० १,३८,६८७

पुणे १,४६,२२९ १,१६,२७३

नाशिक १,०७,००० ६६,७६९

ठाणे १,२९,८७५ ८६,८२९

औरंगाबाद ७२,०१३ ५४,५४०

नागपूर ६५,३०० ५५,८७६

अहमदनगर ७८,४८५ ६२,८८८

जळगाव ७३,७०३ ४४,४१६