शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

३१ लाख २० हजार विद्यार्थी परीक्षेविना पुढच्या वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:12 IST

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षाविना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नववी व अकरावीच्या ...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षाविना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा परीक्षा न घेता थेट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा राज्यातील सुमारे ३१ लाख २० हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.त्यामुळे पुढील वर्षी दहावी-बारावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असणार आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास करता येत नाही. तसेच नववीमध्ये सुद्धा एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास त्याची पुन्हा परीक्षा घेता येते. परंतु, अनेक शाळा दहावीचा निकाल चांगला लागावा, यासाठी अभ्यासक्रमात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना नापास करत असल्याचे दिसून आले आहे. अकरावीला सुद्धा नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे यावर्षी सर्वच विद्यार्थी थेट दहावी व बारावीत प्रवेश होऊ शकतात.

मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली. मागील आठवड्यापर्यंत अकरावीचे व प्रवेश सुरू होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अकरावीचा फारचचा अभ्यासक्रम शिकवून झालेला नाही. मात्र, नववीमध्ये दहावीच्या अभ्यासक्रमासाठी पूरक असणाऱ्या संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट होणे गरजेचे आहे. तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बारावीत जाण्यापूर्वी विज्ञान व वाणिज्य विषयातील काही संकल्पनांची माहिती होणे आवश्यक असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार नसल्या तरी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे महत्त्वाचे आहे, असे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

—---

राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात नववीच्या १७ लाख ९७ हजार ६५५ तर अकरावीच्या १३ लाख २२ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षातही साधारणपणे एवढ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील तब्बल ३१ लाख २० हजार ४१ विद्यार्थी थेट दहावी व बारावीच्या वर्गात गेले आहेत.

—----

राज्यातील प्रमुख शहरांमधील नववी व अकरावीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या आकडेवरी (वर्ष- २०१९-२०२०)

जिल्हा नववी अकरावी

मुंबई १,४०,८७० १,३८,६८७

पुणे १,४६,२२९ १,१६,२७३

नाशिक १,०७,००० ६६,७६९

ठाणे १,२९,८७५ ८६,८२९

औरंगाबाद ७२,०१३ ५४,५४०

नागपूर ६५,३०० ५५,८७६

अहमदनगर ७८,४८५ ६२,८८८

जळगाव ७३,७०३ ४४,४१६