शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

नीरा खोऱ्यातील धरणांत २४.०९ टक्के उपयुक्त पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:11 IST

नीरा : जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व पुढे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिवनदायनी असलेले पुणे- ...

नीरा : जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व पुढे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिवनदायनी असलेले पुणे- सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरणात २६ मे अखेर ६०.१५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, वीर आणि गुंजवणी या चारही धरणांत २४.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गतवर्षी नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने यंदा मेअखेरीस नीरा खोऱ्यातील धरणांत समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा रब्बी हंगामाबरोबर उन्हाळी हंगामात पाण्याचे आवर्तन सलग सुरू राहिल्याने याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नीरा खोऱ्यातील धरणांतील पाणीसाठ्याचा २६ मे रोजी आढावा घेतला असता नीरा देवघर धरणात १ हजार ८५५ द.ल.घ.फूट उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी १५.८२ टक्के आहे. तर ब्रिटिशकालीन भाटघर धरणांत २ हजार ६२१ द.ल.घ.फूट उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ११.१५ टक्के आहे. तसेच, वीर धरणामध्ये ५ हजार ६५९ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ६०.१५ टक्के आहे. तर गुंजवणी धरणांत १ हजार ५०६ द.ल.घ.फूट उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ४०.८१ टक्के आहे.

एकंदरीत नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांत २६ मे रोजी सकाळी सहा वाजता २४.०९ टक्के पाणीसाठा उपयुक्त असल्याची माहिती नीरा पाटबंधारे कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी अशोक चव्हाण यांच्याकडून देण्यात आली आहे.

वीर धरणमध्ये मुबलक पाणीसाठा असल्यामुळे नीरा खोऱ्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळच्या वेळी उसाच्या शेतीला पाणी मिळाले. नुकत्याच गहू, हरभरा, टोमॅटो, कांदा आदी पिकांची काढणी झालेल्या शेतात चारा पिकांचे उत्पादन घेता आले. त्यामध्ये कडवळ, मका, घास ही पिके घेता आली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

वीर धरणातून सासवड नगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, नीरा नदीवरील मांडकी डोहातून जेजुरी नगरपालिका व एमआयडीसीला देखील उन्हाळ्यात पाणीपुरवठा केला जातो. नीरा नदी व डाव्या कालव्यावरून पुरंदरमधील लपतळवाडी, मांडकी, जेऊर, पिंपरे (खुर्द), पिसुर्डी, गुळुंचे, कर्नलवाडी, राख आदी गावातील शेतकऱ्यांनी सहकारी उपसा सिंचन योजना राबवून शेतीसाठी पाणी नेले आहे. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांना ठिबक सिंचन करून फळ बागा लावल्या आहेत. या शेतकऱ्यांना ही या वर्षी पाण्याची चिंता राहिली नाही.

दरम्यान, नीरा उजवा कालव्यातून १ हजार ५५० क्युसेकने विसर्ग, तर नीरा डाव्या कालव्यातून ८२७ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. ३० जुन रोजी पर्यंत नीरा डाव्या कालव्यातून विसर्ग सुरू राहणार आहे.

२६ नीरा

===Photopath===

260521\26pun_10_26052021_6.jpg

===Caption===

२६ नीरा