शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनचा फटका बसलेल्यांना जिल्ह्यात २४ हजार टन धान्य मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:11 IST

पुणे : कोरोना आणि लाॅकडाऊनचा फटका बसलेल्या गरीब लोकांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने केंद्राप्रमाणे मोफत धान्य वाटपाचा निर्णय ...

पुणे : कोरोना आणि लाॅकडाऊनचा फटका बसलेल्या गरीब लोकांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने केंद्राप्रमाणे मोफत धान्य वाटपाचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ६१ टक्के लाभार्थ्यांना तब्बल २४ हजार ६१ टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

राज्य शासनाकडून मे महिन्यासाठी ७७५६.४६ टन गहू व ४९३५.८८ टन तांदूळ असे एकूण १२६९२.३४ टन अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे. आज अखेर राज्य शासनाकडून प्राप्त अन्नधान्याचे ६१.३३ टक्के वाटप झाले. तसेच केंद्र शासनाकडून मे महिन्यासाठी आलेल्या ६८२१.४४ टन गहू व ४५४८.१४ टन तांदूळ असे एकूण ११३६९.५८ टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. आज अखेर केंद्र शासनाकडून प्राप्त अन्नधान्याचे ५६.९७ टक्के वाटप झाले आहे.

राज्य व केंद्र शासनाकडून आलेल्या अन्नधान्याचे १८ मेपर्यंत २४०६१.९२ टन अन्नधान्य जिल्ह्यात मोफत वाटण्यात आले. तसेच उर्वरीत लाभार्थ्यांना महिना अखेरपर्यंत १०० टक्के अन्नधान्य वितरण करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना दिल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी सांगितले.

अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना १ महिन्याकरीता मोफत गहू व तांदूळ वाटपाबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच २६ एप्रिल २०२१ च्या केंद्राच्या आदेशानुसार मे व जूनसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिसदस्य प्रतिमहिना ५ किलो अन्नधान्य मोफत वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.