शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य योजनेची २० वर्षे एकच उत्पन्न मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:10 IST

राजू इनामदार लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्वस्त धान्य योजनेतील सहभागासाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा मागील २० वर्षे बदललेलीच नाही. ...

राजू इनामदार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : स्वस्त धान्य योजनेतील सहभागासाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा मागील २० वर्षे बदललेलीच नाही. वार्षिक ५९ हजार रुपये हीच मर्यादा कायम आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे योजनेसाठी पात्र म्हणजे गरजू असूनही योजनेबाहेरच राहत आहेत.

या योजनेतंर्गत पात्र कुटुंबाला स्वस्त धान्य योजनेतील दुकानदाराकडून २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदूळ मिळतो. त्यासाठी राज्य सरकार त्यांच्याकडील पात्र कुटुंबाची यादी केंद्रीय अन्न महामंडळाकडे देते. ते त्याप्रमाणे संबधित राज्याला धान्याचा कोटा मंजूर करतात. राज्य सरकार त्याचे जिल्हा व तालुकानिहाय वितरण करते व ते लाभार्थीला उपलब्ध होते.

वार्षिक उत्पन्न मर्यादा निश्चितीसाठी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची समिती आहे. सन २००४ मध्ये वार्षिक ५९ हजार रुपये उत्पन्न मर्यादा निश्चित केली. त्यात आजपावेतो कसलाही बदल झालेला नाही. कोणत्याही अन्न व नागरी पुरवठा मंत्र्याने किंवा कोणत्याही खासदाराने संसदेत तसा आग्रहही कधी धरलेला नाही. या समितीनेही कधी तसा विचार केलेला नाही. एखाद्या राज्यानेही तशी मागणी कधी केलेली नाही.

‘आप’ पुणे शाखेने याविषयी केंद्रापासून राज्यापर्यंत सगळीकडे पत्रव्यवहार केला. त्यावेळी त्यांच्या लक्षात ही बाब आली. पक्षाचे श्रीकांत आचार्य यांनी सांगितले, की यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाही स्वस्त धान्य योजनेची गरज आहे. १ ते सव्वा लाख वार्षिक उत्पन्न असलेले कुटुंबही आजच्या महागाईच्या काळात या योजनेसाठी गरजवंतच आहे. मात्र ते योजनेच्या बाहेरच आहेत.

लाभार्थ्यांची संख्या एकूण कुटुंब संख्येच्या फक्त १३ टक्के

या अल्प उत्पन्न मर्यादेमुळे महाराष्ट्रातील लाभार्थी कुटुंबांची संख्या एकूण कुटुंब संख्येच्या फक्त १३ टक्के आहे. पुणे जिल्ह्यातही हेच प्रमाण आहे. या तुलनेत ५९ हजार ते १ लाख अशी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांची संख्या कितीतरी अधिक आहे. त्यांना या योजनेची गरज आता कोरोना बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर अधिक आहे.

--

आम्ही यासंदर्भात पुणे जिल्ह्यातील लोकसभा व राज्यसभेच्या सर्व खासदारांना वैयक्तिक भेट घेऊन संसदेत याविषयी प्रश्न उपस्थित करण्याची मागणी केली आहे. तसेच केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही लिहिले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांनी केंद्रीय प्रधान सचिवांपर्यंत आमची मागणी पोहचवली आहे.

- श्रीकांत आचार्य, आम आदमी पार्टी, पुणे