शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १५९ गावे हाय अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे/ लोणीकाळभोर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने नियमावलीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे/ लोणीकाळभोर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने नियमावलीत बदल करत रुग्णसंख्या वाढत असलेली १५९ गावे हायअलर्ट, तर रुग्णसंख्या कमी होत नसलेली १०६ गावे अलर्ट गावे म्हणून घोषित केली आहे. यात जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचाही समावेश करण्यात आला आहे. हाय अलर्ट व अलर्ट गावांत कोरोना व्यवस्थापनाची जबाबदारी ही उपविभागीय अधिकारी, तसेच घटना व्यवस्थापकांवर राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे. यासाेबतच या गावांतील नागरिकांना अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त गावातून बाहेर पडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे आणि पिंपरीच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अनेक गावे जिल्हा परिषदेेमार्फत हॉटस्पॉट क्षेत्र आणि प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी उपाय योजना करूनही संख्या आटोक्यात येत नव्हती. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत कठोर उपाय योजना करण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यानुसार सर्वेक्षण केले असता, ज्या ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत या ठिकाणची रुग्णसंख्या वाढत आहेत अशी गावे हाय अलर्ट व ज्या ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत याठिकाणची रुग्णसंख्या कमी होत नाही ती अलर्ट गावे म्हणून घोषित करणे क्रमप्राप्त ठरल्याने त्यानुषंगाने संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात रुग्णसंख्या कमी करण्याच्या उद्देशाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १५९ गावे ही हाय अलर्ट, तर १०६ गावे ही अलर्ट म्हणूज जाहीर करण्यात आली आहे.

या सर्व गावांना तालुकास्तरीय अधिकारी यांनी भेटी देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गावस्तरीय समित्या कार्यान्वित कराव्यात व त्यांना मार्गदर्शन करावे. याचबरोबर पोलीस प्रशासनाने वरील ग्रामपंचायत क्षेत्रात पाळत वाढवावी जेणेकरून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होण्यास मदत होईल. तर आरोग्य विभागाने या सर्व गावांमध्ये लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होईल याप्रमाणे नियोजन करावे. जेणेकरून कोरोना संसर्ग आटोक्यात आणणे शक्य होईल, असे आदेश देण्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

चौकट

...तर होणार फौजदारी कारवाई

हाय अलर्ट व अलर्ट गावांतील नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त बाहेर पडू नये, आरोग्यविषयक कामकाज असेल तरच शक्यतो बाहेर पडावे. कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घरात कुटुंबासमवेत असतानाही मास्कचा वापर करावा. याचबरोबर सहव्याधी असणारे नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक बाबींसाठी बाहेर पडल्यानंतर सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

कोट

जिल्ह्यात अनेक गावात ही रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही. यामुळे लॉकडाऊन लावण्यात आला असला, तरी बाधितांचा आकडा कमी होत नसल्याने हा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका नगरपरिषद तसेच नगर पंचायत परिसरात कोरोनाबाधित वाढत आहेत, अशी गावे हाय अलर्ट, तर रुग्णसंख्या कमी होत नसलेली गावे अलर्ट म्हणून घोषित केले असून या ठिकाणी नियमावलींचे कठोर पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

चौकट

सर्व नगरपरिषदा हाय अलर्टमध्ये

जिल्ह्यात १३ नगरपालिका आणि ३ नगरपंचायती आहेत. या सर्व नगरपंचायतीतील रुग्णसंख्या ही अजूनही वाढतीच असल्याने त्यांचा समावेश हा हाय अलर्टमध्ये करण्यात आला आहे.

तालुकानिहाय हाय अलर्ट आणि अलर्ट गावे

तालुका हाय अलर्ट गावे अलर्ट गावे

आंबेगाव १० १३

बारामती १३ १५

भोर ७ ५

दौंड १० ७

हवेली २० ७

इंदापुर ११ २२

जुन्नर १४ ५

खेड १९ ७

मावळ ८ ५

मुळशी १४ १

पुरंदर ११ १०

शिरूर २१ ७

वेल्हे १ ३

एकूण १५९ १०६