शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पालखी मार्गासाठी १२ हजार कोटी रुपये खर्च करणार: नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग विभागातर्फे वाहन अपघात सुरक्षितता आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन गडकरी यांच्या ...

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग विभागातर्फे वाहन अपघात सुरक्षितता आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भारतातील रस्त्यांवर दर वर्षी पाच लाख अपघात होतात आणि त्यात दीड लाख लोकांचे मृत्यू होतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होणे अत्यंत दुर्दैवी असून, लोकांच्या सहकार्यातून अपघातामुळे होणाऱ्या हजारो लोकांचे प्राण वाचवणे शक्य आहे. २०२५ पर्यंत ५० टक्के रस्ते अपघात आणि मृत्यू कमी करणे आणी २०३० पर्यंत शून्य टक्के रस्ते अपघात व मृत्यू कमी करण्याचे आमचे लक्ष असल्याचे गडकरी यांनी सांगितले. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, हरियाणा येथील आयसीएटीचे संचालक दिनेश त्यागी, एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई, एसएई इंडियाचे रश्मी ऊरधवरशे, एमआयटी मिटकॉमच्या संचालिका डॉ. सुनीता कराड, प्र-कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, एमआयटी एडीटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल डॉ. किशोर रवांदे, डॉ. सुदर्शन सानप आदी उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले की, महामार्गावरील, राज्यातील आणि जिल्ह्यातील अपघातस्थळे शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अपघातांची कारणे, जबाबदार कोण आणि समस्या शोधणे आवश्यक आहे. अपघातस्थळे शोधण्यासाठी महामार्ग मंत्रालय अधिक प्रयत्नशील आणि गंभीरही आहे. तामिळनाडू राज्याने ५३ टक्के रस्ते अपघात आणि मृत्यू दर कमी केले आहे. सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था व कॉर्पोरेट्समध्ये रस्ते सुरक्षेबाबत शिक्षण आणि जनजागृती करणे गरजेचे आहे. वाहन आभियांत्रिकीच्या माध्यमातून सुरक्षित वाहन निर्माण करण्याचे धैर्य आहे. वाहनांची क्रॅश टेस्ट, एअर बॅग्स्, ॲटी लॉक सिस्टिम यांसारखे अनेक फिचर्स असणारे वाहन निर्मिती आमचा प्रयत्न आहे. प्रदूषणमुक्त भारतासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा आणि पेट्रोल आणि डिझेलला पर्याय इंधनावरील वाहननिर्मितीला प्रथम प्राधान्य आहे. भारताला सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणार देश बनविण्याबरोबरच एसी ट्रक, रोड जंक्शन, ट्रॅफिक कमी करणे, लेन शिस्त पाळण्यावरती आमचा विशेष भर असणार आहे. पुणे विभागातील विविध रस्त्यांच्या विकासासाठी एक लाख करोड रुपये खर्च करण्यात येणार आहे. असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की, मंत्री नितीन गडकरी यांनी संत ज्ञानेश्वर-संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी विधायक मोठे कार्य केले. देशातील रस्त्यांविषयक अनेक समस्यांचे निराकारण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. देशाची लोकसंख्या वाढत असून वाहनांची संख्याही वाढत आहे. परिणामी पार्किंग, ट्रॅफिक, अपघात आणि प्रदूषण वाढत आहे. नितीन गडकरी यांनी त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून देशात सुरक्षित रस्ते आणि अपघातशून्य मार्ग बनविण्याचे काम केले जात आहेत.

दरम्यान, आयसीएटीचे संचालक दिनेश त्यागी, एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई, एसएई इंडियाचे रश्मी ऊरधवरशे यांनी विचार व्यक्त केले. डॉ. किशोर रवांदे यांनी प्रस्तावना केली. प्रा. स्वप्निल सिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जयश्री फडणवीस यांनी आभार व्यक्त केले.