शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देशातून आतापर्यंत १० लाख टन साखर निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कंटेनरचा तुटवडा निर्माण झाल्याने साखर निर्यातीत अडचणी येत असल्याची तक्रार वेस्ट इंडियन शुगर असोसिएशनच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कंटेनरचा तुटवडा निर्माण झाल्याने साखर निर्यातीत अडचणी येत असल्याची तक्रार वेस्ट इंडियन शुगर असोसिएशनच्या (विस्मा) बैठकीत करण्यात आली. केंद्र सरकारकडे याविषयी मागणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. इथेनॉलचे टँकर ऑइल कंपन्यांकडून स्वीकारले जात नसल्याबाबतही केंद्राला कळवण्याचे ठरले.

पश्चिम भारतातील खासगी साखर कारखान्यांचे ही संघटना प्रतिनिधित्व करतो. शिवाजीनगरच्या साखर संकुलमधील संघटनेच्या कार्यालयात ही बैठक झाली. संघटनेचे अध्यक्ष बी. बी. चौगुले अध्यक्षस्थानी होते. संचालक रणजित मुळे, राहुल घाटगे, संजय शिंदे, बजरंग सोनवणे, कार्यकारी संचालक अजित चौगुले आदी बैठकीस उपस्थित होते.

राज्यात २४ फेब्रुवारी अखेर ८०२ लाख टन उसाचे गाळप झाले, त्यातून ८२ लाख टन साखर निर्मिती झाल्याची देण्यात आली. सोलापूर, विदर्भामधील हंगाम फेब्रुवारी अखेर, कोल्हापूर, मराठवाडा मार्चअखेर, पुणे, सांगली, अहमदनगरचा एप्रिल अखेर विदर्भातील सुरू राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

निर्यातीला सध्या चांगला वाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला चांगला दरही मिळतो आहे. आतापर्यंत ३५ लाख टन साखरेचे करार झाले असून त्यातील १० लाख टन साखर निर्यात झाली आहे. साखर निर्यातीसाठी आवश्यक कंटेनरचा तुटवडा असल्याने निर्यातीचे वेळापत्रक बिघडते. ब्राझीलची साखर बाजारात येण्याआधी भारताची साखर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचल्यास आर्थिक फायदा होईल. त्यामुळे कंटेनरच्या तुटवड्याबाबत केंद्र सरकारला त्वरित कळवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे कारखान्यांनी इथेनॉलची निर्मिती केली, मात्र आता ऑइल कंपन्या इथेनॉल घेत नाहीत. यातून कारखान्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. याविषयी केंद्र सरकारला कळवण्याचा निर्णय घेण्यात आला.