शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या शक्यतेने राजकीय पक्ष सावध पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2023 00:55 IST

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष रंजक अवस्थेत पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेसंबंधी सुनावणीने वेग घेतलेला असताना निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला ह्यशिवसेनाह्ण हे नाव व धनुष्यबाण हे पक्षचिन्ह बहाल केले आहे.

ठळक मुद्देसत्तेच्या साठमारीत बळीराजाकडे सगळ्यांचे दुर्लक्षसेनेला आता दोन्ही कॉंग्रेसशी जुळवून घ्यावे लागेलसहावीच्या विद्यार्थ्याचा उपचारात हलगर्जीपणा

बेरीज वजाबाकी

मिलिंद कुलकर्णी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष रंजक अवस्थेत पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेसंबंधी सुनावणीने वेग घेतलेला असताना निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला ह्यशिवसेनाह्ण हे नाव व धनुष्यबाण हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. जनमानसात त्याची काय प्रतिक्रिया उमटते, याविषयी मतमतांतरे आहेत. कसबा व पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नसल्याने जनमत आता कळणार नाही. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुका होतील, तेव्हा जनमताचा कौल कळेल. अपात्रतेसंबंधी काय निर्णय लागतो, हे बघून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. युती सरकारच्या कामाचा वेग पाहता मध्यावधी निवडणुकांची शक्यता नसली तरी लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होऊ शकतात. आघाडी व शिवसेना-भाजप युती असा दुरंगी सामना रंगेल. मात्र, स्थानिक पातळीवर समीकरणे वेगळी राहतील. ही शक्यता लक्षात घेऊन राजकीय पक्ष सावधगिरीच्या पवित्र्यात आहे.सत्तेच्या साठमारीत बळीराजा वाऱ्यावर

राज्यात सुरू असलेल्या सत्तेच्या साठमारीत बळीराजाकडे सगळ्यांचे दुर्लक्ष होत आहे. निर्यात बंदी असल्याने कांद्याचे भाव घसरले आहेत. कांदा उत्पादक हवालदिल झाला आहे. जगभरात कांद्याची टंचाई असताना त्याचा लाभ उठवला जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. नाफेडने हस्तक्षेप करून कांदा खरेदी करण्याची गरज आहे. मात्र केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व पालकमंत्री दादा भुसे हे प्रयत्न करण्याचे आश्वासन देत आहेत. हीच स्थिती द्राक्ष उत्पादकांची आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव द्राक्षाला मिळत आहे. भाजीपाल्याचे भावदेखील मातीमोल आहेत. एकीकडे शेतकऱ्याला दोन रुपयाने विक्री करावा लागणारा कांदा ग्राहकाला मात्र ३० रुपये किलोने मिळतो. उत्पादक व ग्राहक यांच्यात व्यापाऱ्याला मलिदा मिळतोय. शेतकरी देशोधडीला लागतोय. शेतकऱ्यांचा असंतोष प्रकट होऊ लागला आहे. पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला होता. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या गळ्यात कांद्याची माळ घालण्यात आली. हा उद्रेक लक्षात घ्यायला हवा. शेतकरी आंदोलनाचा अनुभव ताजा आहे.

आघाडीतील वर्चस्वाला धक्का

भाजप-शिवसेना युती म्हणून लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवूनदेखील सत्तेतील दुय्यम पद नाकारून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रिपद स्वीकारणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या गटाला पक्षाचे नाव, चिन्ह गमावल्याने मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या खेळीने महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याने त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. तरीही शिवसेनेतील बंडासंदर्भात पवार यांची भूमिका आणि वक्तव्ये यातून भविष्यातील सूचना होत आहे. शिवसेनेला आघाडीत असलेले महत्त्व आता पूर्वीप्रमाणे राहणार नाही, हे स्पष्ट आहे. सेनेला आता दोन्ही कॉंग्रेसशी जुळवून घ्यावे लागेल. याचा परिणाम स्थानिक राजकारणावर दिसून येत आहे. सिन्नर, निफाड, नांदगाव अशी उदाहरणे घेतली तरी सेनेच्या वाट्याला असलेल्या जागांवर आघाडीत राष्ट्रवादीचा दावा आहे. सेनेतील इच्छुक त्यामुळे अस्वस्थ आहेत. ही स्थिती ठाकरे कशी हाताळतात, हे बघणे रंजक ठरेल.

राऊत, बडगुजर आता लक्ष्य

शिवसेना-भाजप सरकारवर न्यायालयीन कारवाईची टांगती तलवार असली तरी आठ महिन्यांत निर्णयाचा धडाका लावून त्याची प्रचार व प्रसिद्धी करण्यात दोन्ही पक्ष आघाडीवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा भरभक्कम पाठिंबा त्यांना आहे. पंतप्रधानांचा दोनदा मुंबई दौरा आणि अमित शहा यांचा नागपूर, पुणे व कोल्हापूर दौरा पाहता केंद्र सरकारने आता महाराष्ट्राला झुकते माप द्यायचे ठरवलेले दिसते. हे करीत असताना राज्य सरकार व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर टीकास्त्र सोडणाऱ्या नेत्यांवर कारवाईचा धडाका लावला जात आहे. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर संजय राऊत हे लक्ष्य आहेत. १०० दिवस कारागृहात जाऊन आल्यानंतरही राऊत घाबरलेले नाहीत. त्यांच्याविरुद्ध आता ठिकठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. नाशिकचे त्यांचे सहकारी सुधाकर बडगुजर यांची जुनी प्रकरणे उकरून काढली जात आहेत. दडपशाहीचा परिणाम होऊ शकतो, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे.

आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेने विद्यार्थ्यांचे बळी

कोरोनानंतर आरोग्य यंत्रणेच्या सुधारणेसाठी कोट्यवधींचा निधी खर्च झाला. पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावला. औषधी पुरवठा सुरळीत राहील, याकडे लक्ष देण्यात आले. मात्र, मानसिकतेमध्ये बदल होत नसेल तर सरकार तरी काय करेल ? या खात्याच्या केंद्रीय राज्यमंत्री नाशिकच्या असूनही त्या एकट्या काय करू शकणार आहेत? अशाच दोन घटना अंतर्मुख करणाऱ्या आहेत. दिंडोरी तालुक्यातील जोपूळ येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील संकेत ज्ञानेश्वर गालट या सहावीच्या विद्यार्थ्याचा उपचारात हलगर्जीपणा झाल्याने मृत्यू झाला. पन्हाळपाटी या अकोले तालुक्यातील गावात प्रगती वाघ या बारावीच्या विद्यार्थिनीला सर्पदंश झाला, राजापूर (ता. येवला) येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थिनीचा उपचाराअभावी मृत्यू झाला. ह्यविश्वगुरूह्ण म्हणून देशाची ओळख बनविण्याचा प्रयत्न होत असताना उपचाराअभावी मुले अकाली मृत्यू पावत असतील तर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी जागेवर राहत नाही, आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक त्यांची जबाबदारी पार पाडत नसतील, तर यापेक्षा वेगळे काय घडणार आहे?

टॅग्स :Nashikनाशिक