शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

तरुण खासदारांचा घसरता टक्का, सरासरी वयोमान ४६ वर्षे २०१४ मध्ये ५५.४ वर्षे

By प्रेमदास राठोड | Updated: April 18, 2019 05:15 IST

सर्व मोठे पक्ष साठी पार केलेल्यांना हिरीरीने उमेदवारी देत आहेत.

- प्रेमदास राठोडसर्व मोठे पक्ष साठी पार केलेल्यांना हिरीरीने उमेदवारी देत आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पंचविशीतील १३४ उमेदवारांपैकी एकही लोकसभेत जाण्यात यशस्वी झालेला नाही. देशाच्या लोकसंख्येत तरुणांचा टक्का वेगाने वाढत असला तरी लोकसभेची वाटचाल मात्र वृद्धत्वाकडे आहे. पहिल्या लोकसभेत सदस्यांचे सरासरी वयोमान ४६ वर्षे होते. ते आता सरासरी ५५.४ वर्षांवर नेऊन विद्यमान सोळाव्या लोकसभेने पूर्वीचे सर्व विक्रम मोडले. मध्यंतरी एकदा (१९८०) सातव्या लोकसभेत वयोमान ४९.९ वर्षांपर्यंत खाली आले होते, त्यानंतर मात्र ते सातत्याने वाढत गेले. आताही सर्व मोठे पक्ष साठी पार केलेल्यांना हिरीरीने उमेदवारी देत आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पंचविशीतील १३४ उमेदवारांपैकी एकही लोकसभेत जाण्यात यशस्वी झालेला नाही.२००९ च्या लोकसभा निवडणुकीत देशात पन्नाशीपर्यंतचे ५,३२५ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी २२५ जण लोकसभेत पोहोचले. नंतरच्या सोळाव्या लोकसभेत मात्र ही संख्या २०२ पर्यंत खाली घसरली. याउलट पन्नाशीनंतरच्या उमेदवारांचा टक्का मात्र वाढला. २००९ मध्ये ५१ वर्षांवरील २,७४५ उमेदवार रिंगणात होते, त्यातील ३१८ लोकसभेत पोहोचले. गेल्या निवडणुकीत (२०१४) तर ही संख्या चक्क ३४२ पर्यंत वाढली. २००९ मधील ३० वर्षीय खासदारांची संख्या २ होती, २०१४ मध्ये ही शून्य झाली. ३५ वर्षांचे ८ उमेदवार २००९ मध्ये विजयी झाले होते, २००४ मध्ये ही संख्या ४ पर्यंत घसरली. ३६ वर्षीय खासदारांची संख्या २००९ मध्ये १४ होती, ती २०१४ मध्ये ७ झाली. २०१४ मध्ये ४० वर्षीय २४६ उमेदवारांपैकी फक्त ५ लोकसभेवर गेले, २००९ मध्ये ११ जण निवडले गेले होते. ३६ ते ५० वयोगटातील १९४ उमेदवार २००९ मध्ये विजयी झाले होते, ही संख्या २०१४ मध्ये १६८ पर्यंत खाली घसरली. याउलट ६१ ते ७५ वयोगटातील २००९ मधील खासदारांची १२२ ही संख्या २०१४ मध्ये वाढून चक्क १४८ झाली. लोकसभेतील तरुणांचे हे घटते प्रमाण चिंताजनक आहे.महाराष्ट्रातून लोकसभेवर गेलेल्या सदस्यांचे सरासरी वयोमान देखील फार आशादायक नाही. २००९ आणि २०१४ दोन्ही निवडणुकांमध्ये राज्यातून २६ ते ३५ या वयोगटातील ४-४ उमेदवारांनी बाजी मारली. ३६ ते ५० वयोगटातील विजयी उमेदवारांची संख्या २०१४ मध्ये एकने वाढून १५ झाली, २००९ मध्ये ही संख्या १४ होती. २००९ मध्ये ५१ ते ६० वयोगटातील १७ जण विजयी झाले होते, नंतर २०१४ मध्ये ही संख्या १६ झाली होती. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने देशात २०१४ मध्ये २५ ते ३५ वयोगटातील फक्त १७ उमेदवार दिले होते. त्यातील ११ जण विजयी झाले. यात काँग्रेसचे २५ पैकी फक्त दोघेच यशस्वी ठरले. ३६-५० वयोगटातील भाजपाचे ९१ जण लोकसभेत केले. तर काँग्रेसचे या वयोगटातील फक्त १० उमेदवार यशस्वी ठरले. ५१-६० वयोगटातील भाजपाचे १०१ उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसचे फक्त दोघेच जिंकले. ६१-७५ वयोगटातील चक्क १४५ उमेदवार काँग्रेसने दिले, पण मतदारांनी फक्त १९ जणांना पास केले. भाजपाचे या वयोगटातील ११६ पैकी ७२ विजयी झाले.काँग्रेसचे ७६ वर्षांवरील ९ पैकी ८ जणांना मतदारांनी नकारले. ६१ वर्षांवरील भाजपाच्या ७९ खासदारांमुळेच सोळाव्या लोकसभेतील सदस्यांच्या सरासरी वयोमानाने उच्चांक नोंदविली. शिवसेनेने ६० वर्षांच्या आतील १३ तर ६१ वर्षांवरील ५ जणांना गेल्यावेळी लोकसभेवर पाठविले. राष्ट्रवादीने ६० वर्षांच्या आतील २८ पैकी ४ जण आणि ६१ वर्षांवरील ८ पैकी दोघे लोकसभेवर गेले. या निवडणुकीत महाराष्ट्रात पहिल्या दोन टप्प्यातील १७ जागांवर प्रमुख पक्षांनी दिलेल्या उमेदवारांचे सरासरी वयोमान तरुणांचा टक्का कमी करणारा ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या ११ उमेदवारांचे सरसारी वयोमान सर्वाधिक ५८ वर्षे आहे. भाजपाच्या १० उमेदवारांचे सरासरी वयोमान ५७, राष्ट्रवादीच्या ५ उमेदवारांचे वयोमान ५५ तर शिवेसनेच्या ७ उमेदवारांचे प्रमाण ५२ आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019