शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

तरुण खासदारांचा घसरता टक्का, सरासरी वयोमान ४६ वर्षे २०१४ मध्ये ५५.४ वर्षे

By प्रेमदास राठोड | Updated: April 18, 2019 05:15 IST

सर्व मोठे पक्ष साठी पार केलेल्यांना हिरीरीने उमेदवारी देत आहेत.

- प्रेमदास राठोडसर्व मोठे पक्ष साठी पार केलेल्यांना हिरीरीने उमेदवारी देत आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पंचविशीतील १३४ उमेदवारांपैकी एकही लोकसभेत जाण्यात यशस्वी झालेला नाही. देशाच्या लोकसंख्येत तरुणांचा टक्का वेगाने वाढत असला तरी लोकसभेची वाटचाल मात्र वृद्धत्वाकडे आहे. पहिल्या लोकसभेत सदस्यांचे सरासरी वयोमान ४६ वर्षे होते. ते आता सरासरी ५५.४ वर्षांवर नेऊन विद्यमान सोळाव्या लोकसभेने पूर्वीचे सर्व विक्रम मोडले. मध्यंतरी एकदा (१९८०) सातव्या लोकसभेत वयोमान ४९.९ वर्षांपर्यंत खाली आले होते, त्यानंतर मात्र ते सातत्याने वाढत गेले. आताही सर्व मोठे पक्ष साठी पार केलेल्यांना हिरीरीने उमेदवारी देत आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पंचविशीतील १३४ उमेदवारांपैकी एकही लोकसभेत जाण्यात यशस्वी झालेला नाही.२००९ च्या लोकसभा निवडणुकीत देशात पन्नाशीपर्यंतचे ५,३२५ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी २२५ जण लोकसभेत पोहोचले. नंतरच्या सोळाव्या लोकसभेत मात्र ही संख्या २०२ पर्यंत खाली घसरली. याउलट पन्नाशीनंतरच्या उमेदवारांचा टक्का मात्र वाढला. २००९ मध्ये ५१ वर्षांवरील २,७४५ उमेदवार रिंगणात होते, त्यातील ३१८ लोकसभेत पोहोचले. गेल्या निवडणुकीत (२०१४) तर ही संख्या चक्क ३४२ पर्यंत वाढली. २००९ मधील ३० वर्षीय खासदारांची संख्या २ होती, २०१४ मध्ये ही शून्य झाली. ३५ वर्षांचे ८ उमेदवार २००९ मध्ये विजयी झाले होते, २००४ मध्ये ही संख्या ४ पर्यंत घसरली. ३६ वर्षीय खासदारांची संख्या २००९ मध्ये १४ होती, ती २०१४ मध्ये ७ झाली. २०१४ मध्ये ४० वर्षीय २४६ उमेदवारांपैकी फक्त ५ लोकसभेवर गेले, २००९ मध्ये ११ जण निवडले गेले होते. ३६ ते ५० वयोगटातील १९४ उमेदवार २००९ मध्ये विजयी झाले होते, ही संख्या २०१४ मध्ये १६८ पर्यंत खाली घसरली. याउलट ६१ ते ७५ वयोगटातील २००९ मधील खासदारांची १२२ ही संख्या २०१४ मध्ये वाढून चक्क १४८ झाली. लोकसभेतील तरुणांचे हे घटते प्रमाण चिंताजनक आहे.महाराष्ट्रातून लोकसभेवर गेलेल्या सदस्यांचे सरासरी वयोमान देखील फार आशादायक नाही. २००९ आणि २०१४ दोन्ही निवडणुकांमध्ये राज्यातून २६ ते ३५ या वयोगटातील ४-४ उमेदवारांनी बाजी मारली. ३६ ते ५० वयोगटातील विजयी उमेदवारांची संख्या २०१४ मध्ये एकने वाढून १५ झाली, २००९ मध्ये ही संख्या १४ होती. २००९ मध्ये ५१ ते ६० वयोगटातील १७ जण विजयी झाले होते, नंतर २०१४ मध्ये ही संख्या १६ झाली होती. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने देशात २०१४ मध्ये २५ ते ३५ वयोगटातील फक्त १७ उमेदवार दिले होते. त्यातील ११ जण विजयी झाले. यात काँग्रेसचे २५ पैकी फक्त दोघेच यशस्वी ठरले. ३६-५० वयोगटातील भाजपाचे ९१ जण लोकसभेत केले. तर काँग्रेसचे या वयोगटातील फक्त १० उमेदवार यशस्वी ठरले. ५१-६० वयोगटातील भाजपाचे १०१ उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसचे फक्त दोघेच जिंकले. ६१-७५ वयोगटातील चक्क १४५ उमेदवार काँग्रेसने दिले, पण मतदारांनी फक्त १९ जणांना पास केले. भाजपाचे या वयोगटातील ११६ पैकी ७२ विजयी झाले.काँग्रेसचे ७६ वर्षांवरील ९ पैकी ८ जणांना मतदारांनी नकारले. ६१ वर्षांवरील भाजपाच्या ७९ खासदारांमुळेच सोळाव्या लोकसभेतील सदस्यांच्या सरासरी वयोमानाने उच्चांक नोंदविली. शिवसेनेने ६० वर्षांच्या आतील १३ तर ६१ वर्षांवरील ५ जणांना गेल्यावेळी लोकसभेवर पाठविले. राष्ट्रवादीने ६० वर्षांच्या आतील २८ पैकी ४ जण आणि ६१ वर्षांवरील ८ पैकी दोघे लोकसभेवर गेले. या निवडणुकीत महाराष्ट्रात पहिल्या दोन टप्प्यातील १७ जागांवर प्रमुख पक्षांनी दिलेल्या उमेदवारांचे सरासरी वयोमान तरुणांचा टक्का कमी करणारा ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या ११ उमेदवारांचे सरसारी वयोमान सर्वाधिक ५८ वर्षे आहे. भाजपाच्या १० उमेदवारांचे सरासरी वयोमान ५७, राष्ट्रवादीच्या ५ उमेदवारांचे वयोमान ५५ तर शिवेसनेच्या ७ उमेदवारांचे प्रमाण ५२ आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019