शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

उदयनराजेंसाठी पक्षांमध्ये रस्सीखेच, इतर पर्यायांची चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 04:49 IST

सातारा हा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

- दीपक शिंदेसातारा हा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विद्यमान खासदार उदयनराजे भोसले हे मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांत खासदारांनी पक्षाच्या वाढीसाठी कोणतेच काम केले नसल्याचा आरोप पक्षाच्याच आमदारांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केल्याने उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय व्हायचा आहे.कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळाली तरी निवडून येण्याच्या दृष्टीने खासदार उदयनराजे भोसले यांनी तयारी केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि त्याविरोधात असलेल्या गटांच्याही त्यांनीभेटी घेतल्या आहेत. पक्ष कोणताही असला तरी उदयनराजे निवडून येणार असा त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास असल्यामुळे भाजपह, आरपीआय यांनी उदयनराजेंनी आपल्या पक्षात यावे यासाठी पायघड्या घातल्या आहेत. मात्र, जोपर्यंत शरद पवार अंतिम निर्णय देणार नाहीत तोपर्यंत उदयनराजेही कोणत्या पक्षात जायचे याबाबतचा अंतिम निर्णय फायनल घेणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजेंना उमेदवारी दिली नाही तर त्या पक्षाकडे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे असे तीन पर्याय तयार आहेत.२००९ साली शिवसेनेने पुरूषोत्तम जाधव यांना उमेदवारी दिली होती. मात्र, २०१४ मध्ये हा मतदारसंघ आरपीआयच्या वाट्याला गेल्यामुळे पुरूषोत्तम जाधव यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली. तर आरपीआयने अशोक गायकवाड यांना उमेदवारी दिली. यावेळीही पुरूषोत्तम जाधव लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, अपक्ष लढणार की पक्षाच्या तिकिटावर हे अजूनही निश्चित झालेले नाही. त्याबरोबरच भाजपकडून आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.सातारा लोकसभा मतदारसंघातून यावेळी स्वातंत्र्यसैनिक किसन वीर यांचे नातू शैलेंद्र वीर यांनीही अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. तर भाजप, शिवसेना, आरपीआय यांच्या युतीमध्ये हा मतदारसंघ आरपीआयच्या वाट्याला आला आहे. मात्र, उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर हा मतदारसंघ भाजप स्वत:साठी मागू शकते. या मतदारसंघात वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि सातारा हे विधानसभा मतदारसंघ येतात.>सध्याची परिस्थितीपक्षाच्या उमेदवारीसाठी उमेदवारांमध्ये वाद असे राज्यात चित्र असताना साताऱ्यात मात्र, उमेदवारासाठी पक्षांमध्ये चढाओढ आहे. समझोता करण्याची स्थिती. सातारा लोकसभा मतदारसंघावर शिवसेना, भाजप आणि आरपीआय हे तिन्ही पक्ष आपलाच मतदारसंघ म्हणून दावा करीत आहेत. काँग्रेसचे नेते प्रतापराव भोसले यांचे पुत्र मदन भोसले यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते भाजपमध्ये आले तर लोकसभेची रंगत आणखी वाढणार आहे.राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना उमेदवारी मिळाली तर आमदारांचे सहकार्य मिळणार का आणि नंतर उदयनराजेंची मदत होणार का हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९