शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही हगणदरीमुक्त जिल्हा अशक्य

By admin | Updated: May 18, 2015 05:36 IST

निर्मलग्राम मोहिमेंतर्गत जिल्हा परिषद ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील उर्वरित गावे हगणदरीमुक्त करणार होती. मात्र, मार्चअखेर १ लाख १३ हजार ५0७ कुटुंबांकडे

पुणे : निर्मलग्राम मोहिमेंतर्गत जिल्हा परिषद ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील उर्वरित गावे हगणदरीमुक्त करणार होती. मात्र, मार्चअखेर १ लाख १३ हजार ५0७ कुटुंबांकडे अद्याप शौचालये नाहीत. तसेच ९१४ ग्रामपंचायती अद्याप निर्मल होणे बाकी आहे. या वर्षात यापैकी ५५ हजार २८७ शौचालयांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे या वर्षातही हगणदारीमुक्त जिल्हा अशक्य आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामस्थ आदींनी मार्च २०१५ अखेर तालुके निर्मलग्राम करण्याची शपथ घेतली होती. १,३६,७२८ कुटुंबे निर्मल करण्याचा ध्यास घेतला होता. मात्र यापैकी मार्च २0१५ अखेर २४ हजार ६१0 कुटुंबे निर्मल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्हा १00 टक्के हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक पालक अधिकारीही नेमले होते. यात मुळशी तालुका १00 टक्के हगणदारीमुक्त झाला आहे. मार्चअखेर २ हजार ९५३ कुटुंबांकडे शौचालये नसल्याचे दिसत असले तरी या कुटुंबांनी शौचालये बांधण्यास सुरुवात केली असून, ती कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यापाठोपाठ भोर तालुक्याने आघाडी घेतली आहे. वर्षभरात १ हजार ९३२ कुटुंबांनी शौचालये बांधली असून, अद्याप २ हजार ३५४ कुटुंबांकडे शौचालये नाहीत. विभक्त कुटुंबांमुळे हा आकडा जास्त दिसत आहे.