शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

परदेशी साहित्य वाचले म्हणजे विद्वान का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 04:44 IST

ल. म. कडू : मराठीतील सर्वोत्तम साहित्याचा वाचनानंद घ्यावा...

आपल्याकडे एखाद्या वक्त्याने त्याच्या भाषणात दोन-चार इंग्रजी पुस्तकांचा उल्लेख केला की श्रोता कमालीचा सुखावतो. आता त्या वक्त्याने परदेशी साहित्य वाचलं म्हणजे तो विद्वान झाला का? हा प्रश्न आपण कधी स्वत:ला विचारत नाही. सध्या काय वाचताय असं सहजच कुणाला विचारलं अन् त्याने मी अमूक अशा लेखकाची इंग्रजी कादंबरी वाचतो आहे असे सांगितल्यास आपल्याला त्या व्यक्तीबद्दल कुतूहल वाटते. मुद्दा इंग्रजी वाचनाचा मुळीच नाही. ते वाचन तर हवेच मात्र ते करत असताना आपल्या साहित्याकडे दुर्लक्ष व्हायला नको.दिवसेंदिवस वाचनाचा बेगडीपणा वाढत चालला आहे. मुळात आपल्याकडे वाचन हा एकप्रकारचा वाचनसंस्कार असतो हे कुणी लक्षात घ्यायला तयार नाही. ज्याप्रमाणे मुंजीचा संस्कार आहे तसा वाचनाचा संस्कार का असू नये, हा प्रश्न पडतो. वाचनाचे प्रमाण आजकाल कमी होत चालले आहे हे काही अंशी खरे आहे. तरुण वाचतो आहे ही समाधानकारक बाब म्हणावी लागेल. आपण ज्यापद्धतीने सणवार साजरे करतो, एखाद्याला मंगलप्रसंगी काही भेटवस्तू देतो त्याप्रमाणे पुस्तके भेट देण्यास प्राधान्यक्रम द्यायला हवे. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न व्हायला हवेत. नाहीतर वाचनाबद्दलचे सुविचार, केवळ भाषणापुरतेच मर्यादित राहतील.लोकांपर्यंत पुस्तक पोहोचण्याकरिता वाचक, प्रकाशक म्हणून आपली भूमिका काय, याचा आपण विचार केल्यास वाचनाप्रति अधिक सजगता वाढण्यास मदत होईल. वाचनाबद्दलची जागरूकता वाढण्याकरिता काही उपाय सुचवावेसे वाटतात. खेळण्याच्या वयात मुलांच्या हातात पुस्तके पडल्यास पुढे त्यांना पुस्तके वाचा असे दरवेळी सांगण्याची गरज पडत नाही. मात्र आपल्याकडे याबाबत चित्र उलटे पाहायला मिळते. याकरिता केवळ त्या लहान मुलांना दोष देण्यापेक्षा पालक म्हणून आपण काही करणार आहोत की नाही? हा मुख्य प्रश्न आहे. कुमारवयात सक्तीने म्हणा किंवा शिस्तीने त्या मुलांना वाचण्यास प्रवृत्त केले जाते. परंतु त्यांना वाचनाची गोडी लागत तर नाहीच, दुसरीकडे त्यांच्या मनात वाचनाबद्दल कमालीची नकारात्मकता वाढीस लागते. म्हणूनच लहानपणापासूनच पालकांनी जाणीवपूर्वक वाचनसंस्कारासाठी प्रयत्न केल्यास वाचन हा सवयीचा भाग होऊन जाईल. तो आनंदाचा प्रवास असेल. त्यातूनच उद्याची वाचकाची पिढी तयार होईल. आता झाले असे, की आपण सगळे जण कमालीचे उपयुक्ततावादी झालो आहोत. प्रत्येक गोष्टीत स्वत:करिता महत्त्वाचे काय आहे, याचा विचार प्रथम करतो. कला हे माध्यम आपल्याला आनंदीपणाने जगण्यासाठी आधार देते. आत्मविश्वासाने जगण्याकरिता कला उपयोगी पडते. आता आपण त्याकडे उपयुक्ततावाद म्हणून पाहायला लागल्याने त्याचे महत्त्व कमी झाले आहे. याबद्द्ल सांगायचे झाल्यास, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे ना, मग फक्त त्यासंदर्भात पुस्तके वाचावीत. बाकी वाचून काय उपयोग? ललित वाङ्मय यात काय आहे? हीच बाब शाळेतील अभ्यासक्रमाबाबत सांगता येईल.शाळेत ग्रंथालयाचा विद्यार्थी घेत असलेला लाभ याबाबत अभ्यास व्हायला हवा. अभ्यासक्रमाच्या बाहेरचे काही वाचायचे नाही. मग गाईडसंस्कृती आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर वाढली. इतका कमालीचा उपयुक्ततावाद आपल्यात भिनत चालला आहे. मराठी साहित्यात सुंदर ग्रंथ आहेत. त्याचा आस्वाद घ्यावा, त्याचे वाचन करावे, भाषेविषयी कुठली असूया नाही. इथे इंग्रजी आणि मराठी वाददेखील नाही. जागतिक समग्रता आणि भान येण्यासाठी ते वाचन महत्त्वाचे ठरते. मात्र त्याबरोबर आपल्या साहित्यातील श्रेष्ठत्व समजून घेणे गरजेचे आहे. केवळ परदेशी कथा, कादंंबऱ्या चांगल्या आणि आपल्या भाषेतील साहित्य निरस ठरवणे चुकीचे आहे. आपल्या साहित्यात समृद्धता आहे. त्यासाठी आपण वेळ काढून ते साहित्य वाचण्याचे कष्ट घ्यायला तयार आहोत का? हा प्रश्न आहे. आपल्या भाषेतील वाचनसंस्कृती वाढण्यासाठी वाचक म्हणून आपण काय भूमिका घेणार, याचा विचार वाचकाने करावा.

टॅग्स :world book dayजागतिक पुस्तक दिन