शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

समर्थकांचे ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’

By admin | Updated: January 14, 2017 02:50 IST

आचारसंहिता लागू झाल्याने इच्छुकांसह राजकीय पक्षाच्या तयारीलाही वेग आला आहे. मात्र, दुसरीकडे स्थानिक नेत्यांच्या

पिंपरी : आचारसंहिता लागू झाल्याने इच्छुकांसह राजकीय पक्षाच्या तयारीलाही वेग आला आहे. मात्र, दुसरीकडे स्थानिक नेत्यांच्या पक्षांतरामुळे समर्थकांची कोंडी होत आहे. एका बाजुला उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड अन् मतदारांपर्यंत पोहोचण्याची चिंता आहे. यामुळे समर्थकांची धावपळ सुरू असून, ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ अशी स्थिती आहे. महापालिका निवडणूक फेबु्रवारी महिन्यात होणार या दृष्टीने इच्छुकांची आधीपासून तयारी सुरु होतीच. आपल्या स्थानिक नेत्यांमुळे तिकीट मिळण्याची हमी वाटत होती. मात्र, मतदानाची नेमकी तारीख जवळ आली. अन् नेत्यांनी पक्षांतराला सुरवात केली आहे. आतापर्यंत आचारसंहिता कधी लागेल याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र, आता तारीख निश्चित झाल्याने खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रचारयंत्रणा तयार केली आहे. प्रभागाच्या जाहीरनाम्यात राष्ट्रवादीतील समर्थकांनी स्थानिक नेत्यांची छायाचित्रे वापरली आहेत. मतदारांपर्यंत पोहोचणे याबाबतचे नियोजन आखले आहे.मात्र, अचानक नेत्यांनी पक्षांतर केल्याने समर्थकांची कोंडी झाली आहे.दरम्यानच्या काळात इच्छुकांनी प्रभागात फिरुन व कार्यक्रमाद्वारे पक्षाचे चिन्ह मतदारापर्यंत पोहोचवले आहे. परंतु अचानक आपल्या नेत्यांनी पक्षांतर केल्यामुळे इच्छुकांची पंचाईत झाली आहे.(प्रतिनिधी)प्रचारासाठी अवघे १४ दिवसनिवडणुकीसाठी २७ जानेवारी ते ३ फेबु्रवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ४ फेबु्रवारीला अर्जांची छाननी होणार आहे. दि. ७ फेब्रुवारीला अर्जमाघारीची मुदत असून, या दिवशी निवडणूक रिंगणात किती जण असतील, याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर २१ फेबु्रवारीला मतदान होईल. मुलाखत घेतलेल्यांचे काय?शहरातील स्थानिक नेत्यांसह काही पदाधिकारी पक्षांतर करीत आहेत. दरम्यान, ज्या पक्षात दाखल झाले आहेत, त्या पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ऐनवेळी नेत्यापाठोपाठ पक्षांतर केल्यास मुलाखत दिलेल्या इच्छुकांचे काय होणार, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.कार्यकर्त्यांची झाली द्विधा मनस्थितीवर्षानुवर्षे एका पक्षाचे काम करुन विविध पदे भोगली आहेत. तरीही नेत्यांपाठोपाठ लगेचच पक्षांतर करण्याची अद्यापही अनेक समर्थकांची मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे. यासह नेत्यांपाठोपाठ पक्षांतर केल्यास तिकडून उमेदवारी मिळेल का, याचीही धास्ती आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांना कसरत करावी लागणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारीलापासून उमेदवारीअर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. आपण कोणत्या पक्षाकडे जायचे, कोणता झेंडा खांद्यावर घ्यायचा, अशा द्विधा मनस्थितीत कार्यकर्ते आहेत. कमी कालावधीत अधिकाधिक नागरिकांपर्यंत कसे जाता येईल, याबाबत नियोजन केले जात असल्याचे दिसून येत आहे.