शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
4
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
5
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
6
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
7
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
8
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
9
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
10
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
11
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
13
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
14
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
15
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
16
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
17
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
18
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
19
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
20
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड

समर्थकांचे ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’

By admin | Updated: January 14, 2017 02:50 IST

आचारसंहिता लागू झाल्याने इच्छुकांसह राजकीय पक्षाच्या तयारीलाही वेग आला आहे. मात्र, दुसरीकडे स्थानिक नेत्यांच्या

पिंपरी : आचारसंहिता लागू झाल्याने इच्छुकांसह राजकीय पक्षाच्या तयारीलाही वेग आला आहे. मात्र, दुसरीकडे स्थानिक नेत्यांच्या पक्षांतरामुळे समर्थकांची कोंडी होत आहे. एका बाजुला उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड अन् मतदारांपर्यंत पोहोचण्याची चिंता आहे. यामुळे समर्थकांची धावपळ सुरू असून, ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ अशी स्थिती आहे. महापालिका निवडणूक फेबु्रवारी महिन्यात होणार या दृष्टीने इच्छुकांची आधीपासून तयारी सुरु होतीच. आपल्या स्थानिक नेत्यांमुळे तिकीट मिळण्याची हमी वाटत होती. मात्र, मतदानाची नेमकी तारीख जवळ आली. अन् नेत्यांनी पक्षांतराला सुरवात केली आहे. आतापर्यंत आचारसंहिता कधी लागेल याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र, आता तारीख निश्चित झाल्याने खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रचारयंत्रणा तयार केली आहे. प्रभागाच्या जाहीरनाम्यात राष्ट्रवादीतील समर्थकांनी स्थानिक नेत्यांची छायाचित्रे वापरली आहेत. मतदारांपर्यंत पोहोचणे याबाबतचे नियोजन आखले आहे.मात्र, अचानक नेत्यांनी पक्षांतर केल्याने समर्थकांची कोंडी झाली आहे.दरम्यानच्या काळात इच्छुकांनी प्रभागात फिरुन व कार्यक्रमाद्वारे पक्षाचे चिन्ह मतदारापर्यंत पोहोचवले आहे. परंतु अचानक आपल्या नेत्यांनी पक्षांतर केल्यामुळे इच्छुकांची पंचाईत झाली आहे.(प्रतिनिधी)प्रचारासाठी अवघे १४ दिवसनिवडणुकीसाठी २७ जानेवारी ते ३ फेबु्रवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ४ फेबु्रवारीला अर्जांची छाननी होणार आहे. दि. ७ फेब्रुवारीला अर्जमाघारीची मुदत असून, या दिवशी निवडणूक रिंगणात किती जण असतील, याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर २१ फेबु्रवारीला मतदान होईल. मुलाखत घेतलेल्यांचे काय?शहरातील स्थानिक नेत्यांसह काही पदाधिकारी पक्षांतर करीत आहेत. दरम्यान, ज्या पक्षात दाखल झाले आहेत, त्या पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ऐनवेळी नेत्यापाठोपाठ पक्षांतर केल्यास मुलाखत दिलेल्या इच्छुकांचे काय होणार, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.कार्यकर्त्यांची झाली द्विधा मनस्थितीवर्षानुवर्षे एका पक्षाचे काम करुन विविध पदे भोगली आहेत. तरीही नेत्यांपाठोपाठ लगेचच पक्षांतर करण्याची अद्यापही अनेक समर्थकांची मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे. यासह नेत्यांपाठोपाठ पक्षांतर केल्यास तिकडून उमेदवारी मिळेल का, याचीही धास्ती आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांना कसरत करावी लागणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारीलापासून उमेदवारीअर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. आपण कोणत्या पक्षाकडे जायचे, कोणता झेंडा खांद्यावर घ्यायचा, अशा द्विधा मनस्थितीत कार्यकर्ते आहेत. कमी कालावधीत अधिकाधिक नागरिकांपर्यंत कसे जाता येईल, याबाबत नियोजन केले जात असल्याचे दिसून येत आहे.