शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

पाण्याचा होतोय अपव्यय

By admin | Updated: April 24, 2017 04:49 IST

औद्योगिकनगरी म्हणून ओळख मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात अलीकडे लग्नसोहळे जणू मेगा इव्हेंट बनले आहेत. अशा

वाकड : औद्योगिकनगरी म्हणून ओळख मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात अलीकडे लग्नसोहळे जणू मेगा इव्हेंट बनले आहेत. अशा व्हीआयपी लग्नात दिल्या जाणाऱ्या पंचतारांकित जेवणाबरोबर बाटलीबंद मिनरल पाणी देण्याची प्रथा रुजली आहे. मात्र या बाटलीबंद पाण्याच्या सोयीमुळे अशा लग्नात लाखो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. आयटी पार्कमुळे वाकड, हिंजवडीसह पंचक्रोशीत जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. यातूनच अलीकडच्या काळात तयार झालेल्या गुंठामंत्र्यांनी लग्नसोहळा एक प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. त्यामुळे अशा गुंठामंत्र्यांच्या तोडीला तोड देण्यासाठी आणि आपली खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी अनेकांना नाइलाजाने लग्नात वारेमाप खर्च करावा लागत आहे. त्यामुळे प्रामुख्याने या भागात होणाऱ्या लग्न समारंभात यजमानांना पिण्यासाठी सर्रास बाटलीबंद पाणी दिले जात आहे. साधारणत: अशा मिनरल पाण्याच्या बाटल्या बाजारात एक, अर्धा अथवा अडीचशे मिली आकारात मिळतात. मात्र एखाद-दुसरा पाहुणा सोडला, तर कोणताही माणूस एकावेळी सर्व बाटलीभर पाणी पित नाही. एक-दोन घोट पाणी पिऊन उर्वरित बाटलीबंद तिथेच ठेवली जाते. त्यामुळे प्रत्येक बाटलीत किमान ८० टक्के पाणी शिल्लक राहते. अशा अर्धवट पाण्याने भरलेल्या बाटल्यांचा अक्षरश: ढीग मंगल कार्यालयात पाहायला मिळतो. या बाटल्यांत लाखो लिटर शुद्ध पाणी तर वाया जातेच. त्याचबरोबर लाखो रुपयांचा चुराडादेखील होतो. शिवाय या बाटल्या प्रदूषणाला खतपाणी घालत आहेत. (वार्ताहर)