शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

सिग्नलची वेळच ठरतेय कर्दनकाळ

By admin | Updated: August 22, 2015 02:12 IST

अत्यंत वर्दळीच्या पुणे -मुंबई महामार्गाला जोडणारे अंतर्गत रस्ते यामुळे निगडी भक्ती-शक्ती चौकात शहरातील सर्वांत मोठे वाहतूक बेट तयार झाले आहे

संजय माने, पिंपरीअत्यंत वर्दळीच्या पुणे -मुंबई महामार्गाला जोडणारे अंतर्गत रस्ते यामुळे निगडी भक्ती-शक्ती चौकात शहरातील सर्वांत मोठे वाहतूक बेट तयार झाले आहे. सिग्नलचा चुकीचा टायमर, एकाच वेळी चारही बाजूंनी जमा होणारी वाहने यांमुळे वाहनचालक संभ्रमात पडतात. वाहतूक नियमांचे पालन करण्याची इच्छा असूनही संभ्रमात पडणाऱ्या वाहनचालकांमुळे या चौकात अपघात घडू लागले आहेत. बुधवारी दुचाकीवरून जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा बळी गेला. अशा घटना यापूर्वीही घडल्या असून, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक व्यवस्थेतीतील त्रुटी दूर होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले आहे. शहरातील कोणत्याही मोठ्या चौकात किमान चार वाहतूक नियंत्रक दिवे असतात. निगडीतील भक्ती-शक्ती चौक त्यास अपवाद आहे. या ठिकाणी तब्बल आठ सिग्नल आहेत. पुणे- मुंबई महामार्गाने चिंचवडकडून देहूरोडच्या दिशेने जाणारी वाहने भक्ती-शक्ती चौकात सिग्नलला थांबतात. या ठिकाणी एक सिग्नल उंचावर आहे. दुसरा समोर, परंतु थोडा दूर अंतरावर आहे. चिंचवडहून आलेल्या मोटारचालकांना उंचावरील सिग्नल दिसत नाही. समोरच्या सिग्नलचा हिरवा दिवा दिसताच, वाहनूे पुढे येतात. परंतु त्याचवेळी उंचावरील सिग्नलचा लाल दिवा लागलेला असतो. उंचावरील की समोर दिसणाऱ्या सिग्नलचा दिवा महत्त्वाचा मानायचा, हेच वाहनचालकांना कळत नाही. काही वाहने पुढे निघून जातात. तर काही त्याच ठिकाणी थांबून राहतात. चिंचवडहून देहूरोडच्या दिशेने जाण्याच्या मार्गावरील हिरवा दिवा लागल्यानंतर या मार्गाने पुढे जाऊन काही वाहने वाहतूक बेटाला वळसा घेऊन यमुनानगरच्या दिशेने जातात. ती वाहने वाहतूक बेटाला वळसा घालण्याच्या पूर्वीच देहूरोडकडून पुण्याच्या दिशने जाण्याच्या मार्गावरील सिग्नल सुरू होतो. हिरवा दिवा दिसताच वाहने मार्गस्थ होतात. सिग्नलचे टायमर यंत्रणेचे चुकीचे सेटिंग असल्याने या चौकात वाहनचालकांची गोंधळाची स्थिती निर्माण होते. थांबायचे का जायचे, हेच कळत नाही. त्यात अपघात घडू लागले आहेत. निगडी चौकात वरच्या बाजूला प्राधिकरणात जाण्यासाठी रस्ता आहे. तसेच, पुढे जाऊन वळण घेतल्यास ट्रान्सपोर्टनगरीकडे जाता येते. मुंबईहून, तसेच ट्रान्सपोर्टनगरीतून बाहेर पडणारी वाहने वाहतूक बेटाजवळून पुण्याकडे मार्गस्थ होतात. त्यामध्ये मोठे कंटेनर आणि अवजड वाहनांचा समावेश असतो. मोठी अवजड वाहने वाहतूक बेटाला वळसा पूर्ण करण्याअगोदरच सिग्नलची वेळ संपते. वळण घेताना अवजड वाहने रस्ता व्यापून टाकतात. तेवढ्यात दुसऱ्या बाजूची वाहतूक सुरू होते. निगडी चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक, तसेच वर्दळ असताना वाहतूक नियोजनासाठी पोलिसांची मात्र कमतरता जाणवते. उपलब्ध वाहतूक पोलीस आणि कर्मचारीही या चौकात लक्ष देण्याऐवजी भक्ती-शक्ती उद्यान परिसरात लावण्यात येणाऱ्या वाहनचालकांना हटकण्यात, त्यांची वाहने उचलण्यात आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यात व्यस्त असतात. दर दहा मिनिटाला वाहतूक पोलिसांचे वाहन उचलण्याचे पथक या परिसरात घिरट्या मारताना दिसून येते. हातगाड्या, टपऱ्यांच्या बाजूला दुचाकी लावली की, लगेच उचलून न्यायची, वाहनचालक शोध घेत आल्यास त्याच्याकडून पैसे उकळायचे, दंडाची पावती फाडायची. यामध्ये उपलब्ध स्टाफ कायम व्यस्त असतो. हे काम वाहतूक बेटाजवळील वाहतूक नियंत्रणापेक्षा फायद्याचे असल्याने त्याच कामाला प्राधान्य दिले जात असल्याने अपघाताच्या घटनांवर नियंत्रण आणणे शक्य होत नाही.