शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
4
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
5
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
6
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
7
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
8
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
9
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
10
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
11
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
12
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
13
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
14
'सैराट'मधील इंटिमेट सीनबद्दल पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली- "मी घाबरले होते, पण..."
15
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
16
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
17
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
19
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगावात शिवसेनेवर आत्मचिंतनाची वेळ

By admin | Updated: February 25, 2017 02:13 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन पाटलांच्या लढाईत अपेक्षेप्रमाणे माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा विजय झाला

विलास शेटे, मंचरजिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन पाटलांच्या लढाईत अपेक्षेप्रमाणे माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा विजय झाला. राष्ट्रवादीने पंचायत समितीत बहुमत मिळवून जिल्हा परिषदेच्या ४ जागा निर्विवादपणे जिंकल्या आहेत. शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले असून, त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. प्रचारकाळात वळसे-पाटील व आढळराव-पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या; मात्र मतदारांनी राष्ट्रवादीला कौल दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीच किंग असल्याचे या निकालाने दिसून आले आहे. मंचर गणातील अपक्ष उमेदवार राजाराम बाणखेले यांच्या विजयाचा विचार राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षांना करावा लागणार आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आरोप-प्रत्यारोपांनी गाजली. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी आक्रमकपणे प्रचार केला. त्यांच्या टीकेचा रोख वळसे-पाटील यांच्यावर होता. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनीही प्रत्युतर दिले; मात्र त्याचबरोबर विकासकामांचा लेखाजोखा मांडला. दोन्ही बाजूंनी विकासकामे केली नसल्याचा आरोप एकमेकांवर करण्यात आला. अर्थात, प्रचारात केवळ वळसे-पाटील व आढळराव-पाटील हे दोनच नेते असल्याने खरी लढाई दोन पाटलांमध्ये रंगली गेली. शिवसेना व राष्ट्रवादीच्या या लढाईत दिलीप वळसे-पाटील यांची सरशी झाली. मतदारांनी विकासकामांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे. ग्रामपंचायतीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने विजय मिळविला आहे. आंबेगाव तालुक्यातील जनता केवळ लोकसभेला शिवसेना म्हणजेच खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या पाठीशी उभी राहते. इतर वेळी मात्र ती राष्ट्रवादीला साथ देत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे. सहकारक्षेत्रावर राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. संघटनात्मक पातळीवरसुद्धा राष्ट्रवादीचे चांगले काम आहे. त्याउलट, शिवसेनेत संघटना ठराविक ठिकाणीच राहिली आहे. पक्षात काहीशी मरगळ आलेली दिसते. खासदार तालुक्यात असतील तेव्हाच शिवसेनेच्या गोटात काहीशी हालचाल दिसते. इतर वेळी मात्र कामकाज ठप्पच असते.विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी तालुक्यात केलेली विकासकामे हाच राष्ट्रवादीचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता. शिवसेनेनेही खासदार आढळराव-पाटील यांची विकासकामे हा मुद्दा पुढे केला. मात्र, वळसे-पाटील यांनी प्रचाराची जी आखणी केली, ती प्रभावी ठरली गेली. जिल्हा परिषदेच्या ५ पैकी केवळ एक जागा शिवसेनेला मिळाली, तर उर्वरित ४ जागा राष्ट्रवादीने मोठ्या मताधिक्याने जिंकल्या. पेठ-घोडेगाव गटातील विजयी जागा थोड्याशा मताधिक्याने शिवसेनेला मिळाली. आढळराव-पाटील यांच्या लांडेवाडी गावाच्या मताधिक्यावर हा गट शिवसेनेला मिळतो. या वेळीही तसेच झाले. निकाल अपेक्षित लागले आहेत. कळंब-चांडोली जिल्हा परिषद गटात शिवसेनेला विजयाची आशा होती; मात्र या गटातील काही गावांत राष्ट्रवादीला एकगठ्ठा मतदान झाल्याने जिल्हा परिषदेबरोबरच पंचायत समितीच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. पारगाव अवसरी बुद्रुक गटात चुरशीची लढत झाली. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे पुतणे विवेक वळसे-पाटील यांनी अरुण गिरे यांचा पराभव केला. मात्र, अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणात शिवसेनेला झालेले मतदान राष्ट्रवादीला विचार करायला लावणारे आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पंचायत समितीला शिवसेनेचे रवींद्र करंजखेले निवडून आल्याने राष्ट्रवादीने त्याबाबत चिंतन करणे गरजेचे आहे.