शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्याच्या अंगावर फेकली शाई

By admin | Updated: July 8, 2017 02:16 IST

तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या सोमाटणे जलउपसा केंद्रावरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ऐन पावसाळ्यात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या सोमाटणे जलउपसा केंद्रावरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ऐन पावसाळ्यात पाणी मिळत नसल्याने भाजपा-जनसेवा विकास समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी महावितरणची येथील महिला अधिकारी आणि नगरसेवकांनी वडगाव केंद्र अधिकाऱ्याच्या तोंडावर शाई फेकून निषेध व्यक्त केला. विद्युतपुरवठा सुरळीत न केल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा पाणीपुरवठा समितीचे सभापती तथा उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी या वेळी दिला. गेल्या ७२ तासांपासून पवनानदीवरील सोमाटणे पंप-हाऊसचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संपूर्ण तळेगाव शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेस त्याचा फटका बसला आहे. त्याच्या निषेधार्थ उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी भाजपा व जनसेवा विकास समितीने महावितरणच्या येथील कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला.वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याबाबत नगरपालिकेने वारंवार तक्रारी करूनही महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्याने तसेच अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने दोन्ही पक्षाचे नगरसेवक आणि संतप्त कार्यकर्त्यांनी या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या अंगावर काळी शाई फेकली. दरम्यान, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता एम. पी. तेलके यांच्यावर मोर्चेकरांना प्रश्नांचा भडीमार केला. या वेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, सत्तारूढ पक्षनेते सुशील सैंदाणे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, भाजपाचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे-पाटील, नगरसेवक संदीप शेळके, अरुण भेगडे, संग्राम काकडे, संतोष शिंदे, अमोल शेटे, अतुल मराठे, नगरसेविका नीता काळोखे, शोभा भेगडे, काजल गटे, अनिता पवार, रजनी ठाकूर, मंगल जाधव, आशितोष हेन्द्रे, अजय भेगडे मोर्चात सहभागी झाले होते.दरम्यान मावळ तालुक्यामध्ये अनेक नागरिकांनी सेकंड होमसाठी पसंती दिली आहे. परंतु वाढत्या भारनियमनाच्या त्रासाने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याचा परिणाम बांधकाम व्यावसायावरही झाला आहे. तसेच उद्योगधंद्यावरही मोठ्याप्रमाणात परिणाम होत आहे. वीजेच्या भारनियमन आणि खंडीत वीजपुरवठ्यातून मावळ तालुक्याची सुटका करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. परंतु याकडे विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. अशी तक्रार परिसरातील नागरिक करत आहेत. नागरिकांचे हाल : पाणी मिळत नसल्याने गैरसोयमहावितरण कंपनीस नगरपालिका दरमहा सुमारे २५ ते ३० लाख रुपये वीजबिलापोटी देत असते. सर्वात जास्त महसूल देणाऱ्या ग्राहकास कंपनीकडून व्यवस्थित सेवा मिळत नाही. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीउपसा करणे आणि वितरण यांचा मेळ साधता येत नाही. ऐन पावसाळ्यात लोकांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत. वीज कंपनीचे अधिकारी सार्वजनिक पाणी वितरणाच्या समस्येबाबत अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. - सुनील शेळके, उपनगराध्यक्ष