शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

अधिकाऱ्याच्या अंगावर फेकली शाई

By admin | Updated: July 8, 2017 02:16 IST

तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या सोमाटणे जलउपसा केंद्रावरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ऐन पावसाळ्यात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या सोमाटणे जलउपसा केंद्रावरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ऐन पावसाळ्यात पाणी मिळत नसल्याने भाजपा-जनसेवा विकास समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी महावितरणची येथील महिला अधिकारी आणि नगरसेवकांनी वडगाव केंद्र अधिकाऱ्याच्या तोंडावर शाई फेकून निषेध व्यक्त केला. विद्युतपुरवठा सुरळीत न केल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा पाणीपुरवठा समितीचे सभापती तथा उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी या वेळी दिला. गेल्या ७२ तासांपासून पवनानदीवरील सोमाटणे पंप-हाऊसचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संपूर्ण तळेगाव शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेस त्याचा फटका बसला आहे. त्याच्या निषेधार्थ उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी भाजपा व जनसेवा विकास समितीने महावितरणच्या येथील कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला.वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याबाबत नगरपालिकेने वारंवार तक्रारी करूनही महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्याने तसेच अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने दोन्ही पक्षाचे नगरसेवक आणि संतप्त कार्यकर्त्यांनी या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या अंगावर काळी शाई फेकली. दरम्यान, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता एम. पी. तेलके यांच्यावर मोर्चेकरांना प्रश्नांचा भडीमार केला. या वेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, सत्तारूढ पक्षनेते सुशील सैंदाणे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, भाजपाचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे-पाटील, नगरसेवक संदीप शेळके, अरुण भेगडे, संग्राम काकडे, संतोष शिंदे, अमोल शेटे, अतुल मराठे, नगरसेविका नीता काळोखे, शोभा भेगडे, काजल गटे, अनिता पवार, रजनी ठाकूर, मंगल जाधव, आशितोष हेन्द्रे, अजय भेगडे मोर्चात सहभागी झाले होते.दरम्यान मावळ तालुक्यामध्ये अनेक नागरिकांनी सेकंड होमसाठी पसंती दिली आहे. परंतु वाढत्या भारनियमनाच्या त्रासाने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याचा परिणाम बांधकाम व्यावसायावरही झाला आहे. तसेच उद्योगधंद्यावरही मोठ्याप्रमाणात परिणाम होत आहे. वीजेच्या भारनियमन आणि खंडीत वीजपुरवठ्यातून मावळ तालुक्याची सुटका करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. परंतु याकडे विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. अशी तक्रार परिसरातील नागरिक करत आहेत. नागरिकांचे हाल : पाणी मिळत नसल्याने गैरसोयमहावितरण कंपनीस नगरपालिका दरमहा सुमारे २५ ते ३० लाख रुपये वीजबिलापोटी देत असते. सर्वात जास्त महसूल देणाऱ्या ग्राहकास कंपनीकडून व्यवस्थित सेवा मिळत नाही. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीउपसा करणे आणि वितरण यांचा मेळ साधता येत नाही. ऐन पावसाळ्यात लोकांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत. वीज कंपनीचे अधिकारी सार्वजनिक पाणी वितरणाच्या समस्येबाबत अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. - सुनील शेळके, उपनगराध्यक्ष