शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

सुधा पूल : शंभरी पार करुनही वाहतूक सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 03:17 IST

तळेगाव दाभाडे-चाकण रस्त्यावरील खालुंबे्रजवळील सुधा नदीवरील १०५ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.

देहूगाव - तळेगाव दाभाडे-चाकण रस्त्यावरील खालुंबे्रजवळील सुधा नदीवरील १०५ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. या पुलाची स्थिती धोकादायक असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्याची मागणी होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुलाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. पुलावर, तसेच जवळच अनेक अपघात झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती बळी घेतल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करणार अशा संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिक करीत आहेत.प्रामुख्याने खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतून शेतीची उत्पादने व भाजीपाला (तरकारी) मुंबई शहराला मोठ्या प्रमाणात पुरवला जातो. या परिसरातील भाजीपाला व धान्य पूर्वी तळेगाव, चिंचवड व देहूरोड रेल्वे स्टेशनकडे बैलगाडीच्या मदतीने आणला जात होता. मात्र, रस्त्यात नद्यांचे अडथळे येत होते. यापैकी देहूरोड व तळेगाव रेल्वे स्टेशनला जोडणाºया या तळेगाव-चाकण रस्त्यावर १९१२ मध्ये सुधा नदीवर पूल बांधण्यात आला. पुलामुळे पावसाळ्यातही मालाची वाहतूक सहज आणि वेगाने होऊ लागली. सध्या तळेगाव-चाकण हा रस्ता अहमदनगर व नाशिक जिल्ह्याला जोडणारा जुना व महत्त्वाचा राज्य मार्ग आहे.औद्योगिकीकरणामुळे याच रस्त्याकडेच्या खालुंब्रे, म्हाळुंगे (इंगळे), खराबबाडी, नाणेकरवाडी अशा गावांचा विकास झाला. याच रस्त्याला जोडणाºया आंबेठाण, शिंदे, वासुली, सुदुंबरे ही गावेही विकसित होत आहेत. परिणामी कामगार ववाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.सध्या या पुलाची दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या सुरुवातीला देहूफाटा, तळेगाव व चाकणच्या बाजू अशा दोन्ही बाजूंना मोठमोठे खड्डे पडले आहेत. याच पुलाला समांतर पूल उभारण्यात आला आहे. त्याच्याही सुरुवातीला हे खड्डे पाहायला मिळतात. हे खड्डे इतके मोठे आहेत, की कोणतेही वाहन सहज उलटू शकते.वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन थेट नदीत जाऊन मोठा अपघात होऊ शकतो. तळेगावकडून चाकणकडे जाताना तर सुधा नदीच्या पुलाच्या मध्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, हा पूल धोकादायक झाला आहे.हा पूल १०० वर्षांचा झाला असून, तो वाहतुकीसाठी धोकादायक होऊ शकतो, असे पत्रही मागे ब्रिटिश सरकारने पाठविले होते. या पुलावर एकेरी वाहतूक सुरू आहे. पूल कमकुवत झाला असून, पुलाच्या दोन्ही बाजूंचे कठडे तुटलेले आहेत. प्रवेश करतानाच वळण असल्याने वाहने वेगाने येत असतात. अपघात झाल्यास या भागात वाहने थेट नदीपात्रात जातात. पुलाच्या खालील बाजूला दगडी भिंतीवर पिंपळाची झाडे उगवली असून, झाडांची मुळे भिंतीत गेली आहेत. यामुळे भिंती कमकुवत झाल्या आहेत. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे महाडसारखी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत काय, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड