शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रेशीमगाठी

By admin | Updated: May 14, 2017 19:03 IST

याच झाडाशी ती अनेकदा हितगूज करीत असे

ऑनलाइन लोकमत

दुपारच्या निवांत वेळी अर्चना अंगणातल्या बहरलेल्या शेवंतीच्या फुलांकडे पाहत विचारात मगA होती. याच झाडाशी ती अनेकदा हितगूज करीत असे, आपले सुख-दु:ख सांगत असे. तिला शेवंतीचं फूल आवडत असल्याने लगA होऊन सासरी गेल्यावरही तिने हे रोप लावले होते. या झाडाच्या फुलव्याप्रमाणे तिचा संसारही फुलत होता. ती, महेश आणि छोटी सोनाली असा सुखाचा संसार सुरू होता. अर्चनाचे शेवंतीवेड महेशला माहीत असल्याने तो ऑफिसमधून येताना न चुकता तिला वेणी आणत असे. एके दिवशी वाचायला दिलेले पुस्तक घेण्यासाठी गेले असताना, अर्चनाने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तिचे मन थोडे मोकळे झाल्यावर ती सांगू लागली. आता नाही राहायचे मला इथे, अगदी असह्य झाले आहे. रोजच्या कटकटीचा आता कंटाळा आला आहे. किती दिवस जगायचे असे मनाविरुद्ध. हे ऐकून खर तर धक्काच बसला होता. तिला सांगितले, संसार असा पटकन तोडता येत नाही. तो करत असताना एकाने माघार घ्यावीच लागते. अशी तडजोड केली तरच आनंद निर्माण होऊ शकतो. पण कायमची माहेरी जाण्याच्या निर्णयावर अर्चना ठाम होती. शेवटी ज्याचे प्रश्न त्यालाच सोडवावे लागतात.  घरी आली पण अशी कितीतरी जोडपी डोळ्यासमोर येऊ लागली. वरवर सगळे चांगले दिसत असले, तरी अनेकदा मैत्रिणींच्या गप्पांमधून हे संसाराचं कोड वाढतच जाई आणि मनात विचार येई.प्रेमविवाह असेल तर ब:याच गोष्टी आधी माहीत असतात. पण ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचे आहे, त्याला फक्त 15-20 मिनिटांत (चहा पोह्यांच्या कार्यक्रमापुरता) पाहायचे, पसंत करायचे, पत्रिका जुळत असेल तर लगA ठरून मुहूर्त ठरवायचा. अशावेळी एकमेकांच्या गुणदोषांसह  स्वीकारलेले असते. लगA झाल्यावर मनासारखे दान पडलं तर ठीक, पण न आवडणारं दान पडूनसुद्धा हिंमत व सबुरीने जगता येते.आमच्या कॉलनीतील वसुधा अतिशय हुशार. कॉलेजला नेहमी पहिला नंबर, पहिल्याच प्रय}ात उत्तम नोकरी लागली. पती पण चांगले कमवते. पण त्यांनी लगA ठरवतानाच अट घातली, नोकरी केलेली मला चालणार नाही. माङया पगारात उत्तम संसार होईल. लगAानंतर 15 वर्षे मजेत गेले. मुलं मोठी होत होती. पण तिच्या पतीला आजाराने गाठले, प्रचंड पैसा लागला. अशावेळी वसुधाला वाटे आपली नोकरी असती, तर एवढी पैशांची चणचण भासलीच नसती. पण तिने संधी गमावली होती. संसारात असे चढउतार चालूच असतात. असंच काहीसं उदाहरण केतकीचे. तिचा आवाज उत्तम. शाळेत अनेक बक्षीसं मिळवलेली, पण बायकोनी घरातच राहायचं. बंगला, गाडी नोकर सगळं दिमतीला होत. पण गाण्याची इच्छा पूर्ण झाली नाही.लगAाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात. संसार दोन घरे जोडण्यासाठी उभा राहत असतो. दोन घरेच नव्हे तर दोन मनेही या नात्याने, या पवित्र बंधनाने जोडली जातात. सप्तपदीची सात पावले सोबत चालताना आयुष्यभराची साथ निभावण्याचे घेतलेले ते वचन असते. पण याचा विसर पडून छोटय़ा छोटय़ा कारणाने खटके उडू लागतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. कुणीही कुणासारखं नसतं. आवड विरुद्ध असते. त्याला भटकंती आवडते, तर तिला घरात राहणेच जास्त आवडते. त्याला मित्रांची आवड, तसेच खूप बोलणे तर हिला कुणीच आलेले आवडत नाही. त्याला मॉडर्न राहण्यात इंटरेस्ट तर हिला एकदम साधी राहणी पसंत असते. असे विजोड वागणे असले तरी संसाराचा गाडा चालू असतो. 20-25 वर्षापूर्वीचा काळ आणि आताचा काळ यात खूपच फरक आहे. मुली खूपच शिकलेल्या व कमावत्या असतात, त्यामुळे त्यांच्या अपेक्षाही उंचावलेल्या असतात. असं असलं तरी नवीन घरात प्रवेश करताना मुलीने हे स्वीकारलेलेच असते की, आता मला फक्त मुलगी किंवा बहीण नाही तर प}ी, सून, मामी, काकू अशा भूमिका वठवाव्या लागणार आहे. पण लगAाआधी आई - वडिलांच्या छत्राखाली मायेने वाढलेल्या या मुलीची अपेक्षा असते फक्त सगळ्यांकडून प्रेमाची, तिला समजून घेण्याची. पण नव:यासकट सगळेच तिच्या विरुद्ध वागू लागले. सतत टोमणे मारू लागले तर काय करावे, हा मोठा प्रश्न तिच्यापुढे असतो. अनेक सुशिक्षित घरात देखील हा प्रकार पाहायला मिळतो.शेवटी काय तर कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा, 32 गुण जुळले तरी उरलेल्या 4 गुणांशीच लगA होत असतं. आपल्याला हवी असलेली व्यक्ती मिळणं हा नशिबाचाच भाग असतो. जुळून आलेल्या रेशीमगाठी प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. संसारातल्या नाजूक तारा जुळल्या तर सूर कधीच बेसूर होत नाहीत.- विशाखा देशमुख