शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:32 IST

पावसाळा सुरू झाल्याने साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहे. स्वाइन फ्लूपाठोपाठ आता डेंगीचे रुग्ण आढळण्यास सुरूवात झाली आहे.

पिंपरी : पावसाळा सुरू झाल्याने साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहे. स्वाइन फ्लूपाठोपाठ आता डेंगीचे रुग्ण आढळण्यास सुरूवात झाली आहे. रविवारी सकाळी डेंगीने एकाचा बळी घेतला. नागरी आरोग्याकडे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हनणे आहे.पावसाळ्यातील आरोग्यांचा समस्या आणि दूषित पाण्यामुळे होणाºया आजारात प्रचंड वाढ झाली आहे. काविळीचे रुग्णांमध्ये तिपटीने, तर टायफाईडच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. उपलब्ध सुविधांचा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर होत असल्याने पर्यावरणावर आणि आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे.काही दिवसांपासून शहरात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. प्रदूषित पाण्याद्वारे गॅस्ट्रो, कावीळ, टायफाईड, जठरांचा व आतड्यांचा दाह, विषमज्वर हे आजार होतात. पावसाळा सुरू झाल्याने स्वाइन फ्लू या आजाराने डोके वर काढले आहे. पावसाळ्यातील साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे डासांचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे होणारे डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया आदी रोगांची लागण होऊ शकते. नागरी आरोग्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांत साथीचे आजारांचे रुग्ण वाढू लागले आहेत.