शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

नियमांची वाट लावतोय रिक्षावाला

By admin | Updated: December 8, 2015 00:02 IST

पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षांची वाहतूक सुरू आहे. चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षांची वाहतूक सुरू आहे. चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. मनमानी पद्धतीने भाडेआकारणी केली जाते. नियमापेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक केली जाते. पण या प्रकाराकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांची अरेरावी वाढली आहे. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. रावेत परिसरातील रावेत बीआरटी मुख्य चौक, शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन, रेल विहार बिजलीनगर आदी भागांत असणाऱ्या रिक्षास्थानकावरील रिक्षाचालक मनमानीनुसार प्रवाशांकडून भाडे आकारतात. प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात शाब्दिक बाचाबाची पाहावयास मिळते. वाल्हेकरवाडी ते चिंचवड हे अंतर साधारणत: दोन ते अडीच किमी असताना नियमानुसार मीटरप्रमाणे २९.६२ रुपये एवढे भाडेआकारणी अपेक्षित आहे. रिक्षाचालकाने मात्र प्रवाशांकडे ६०-७० रुपयांची मागणी केली. मीटरची विचारणा केली असता अरेरावीची भाषा वापरून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. बिजलीनगर रेल विहार चौक ते निगडी मीटरप्रमाणे भाडेआकारणी ३०-३५ रुपये होत असताना येथे मात्र प्रवाशांकडे ८० रुपयांची मागणी केली जाते. हीच अवस्था या मार्गावर पाहावयास मिळते. आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूंस असणाऱ्या रिक्षाथांब्यावरून रावेत, आकुर्डी, वाल्हेकरवाडी परिसरात जाण्याकरता १०० व त्यापेक्षा अधिक रकमेची मागणी केली. परिसरातील अनेक मार्गांवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे रिक्षाचालक भाड्याकरता मनमानी करतात. रात्रीच्या वेळी हेच दर दुप्पट-तिप्पट होतात. कोणत्याही रिक्षास्थानकावर रिक्षाचालक गणवेश घालत नसल्याचे आढळले. चिंचवड : असभ्य वर्तन, मनमानी भाडे, वाहतूक नियमांची पायमल्ली करत ‘हम करे सो कायदा’ या आविर्भावात असणारे रिक्षाचालक प्रवाशांची लूट करत असल्याचे वास्तव चिंचवड परिसरात दिसत आहे. दळवीनगरमधील भाजी मंडईजवळ असणाऱ्या रिक्षा स्टँडवर नेहमीच हुल्लडबाजी सुरू असते. येथील एकाही चालकाच्या अंगावर वर्दी नसते. अल्पवयीन मुले रिक्षा चालवत आहेत. बहुतांशी जणांकडे हम करे सो कायदाबक्कल नंबर व वाहन परवाना नाही. चिंचवड रेल्वे स्टेशन समोरही रिक्षाचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारत आहेत. बाहेरगावातून आलेल्या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेतले जाते. मीटर पद्धत ही वापरात नाही. दोन किलोमीटर प्रवासासाठी ५० रुपये मागितले जातात. रात्रीच्या वेळी तर प्रवाशांकडून जास्त भाडे आकारले जाते. पुणे-मुंबई महामार्गावर तर वाटेल तिथे रिक्षा उभ्या केल्या जातात. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून जास्त पैसे कमावण्याचा धंदा जोमात सुरू आहे. चिंचवड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लांबलचक रिक्षांच्या रांगा लागलेल्या असतात. स्टँडवर किती रिक्षा उभ्या असाव्यात, याचे नियम पाळले जात नाहीत. चिंचवडगाव, थेरगावपर्यंत प्रवासी वाहतूक केली जाते.पोलिसांच्या आशीर्वादाने नियम धाब्यावरभोसरी शहरातील प्रत्येक भागात तीनआसनी व सहाआसनी रिक्षांचा सुळसुळाट सुरू आहे. जवळपास सर्वच रिक्षा अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे चित्र आहे. कोणताही रिक्षाचालक मीटरप्रमाणे पैसे घेत नाही. शिवाय रिक्षा चालवताना पाळावयाच्या नियमांना बगल देऊन राजरोसपणे परमिट नसताना गाडी चालवली जाते. परमिट असेल, तर परमिटच्या सर्व नियमांना बगल दिली जाते. याला जेवढा जबाबदार रिक्षाचालक, तेवढेच जबाबदार पोलीस आहेत. सर्व नियम कागदावर ठेवून शहरात होणारी अवैध रिक्षा वाहतूक पोलिसांच्याच ‘लेनदेन’मुळे राजरोसपणे सुरू आहे. पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, वाकड, नाशिक फाटा, तसेच शहरातील अनेक भागांतून तीनआसनी व सहाआसनी रिक्षा प्रवासी वाहतूक करीत आहेत. यातील बहुतांश रिक्षांचा भोसरीत वावर असतो. आरटीओच्या नियमाप्रमाणे ज्या रिक्षांना परमिट आहे. त्याच रिक्षांना प्रवासी वाहतूक करता येते. शिवाय प्रत्येक रिक्षाचालकाने खाकी गणवेश घालून बिल्ला लावला पाहिजे. मात्र यातील कोणताच नियम पाळला जात नाही. भोसरीतून आळंदी रस्ता, संत ज्ञानेश्वर मंडई, लांडेवाडी चौक, छत्रपती शिवाजी चौक, भोसरी उड्डाणपूल हे रिक्षाचे प्रमुख थांबे आहेत. भोसरीत तीन व सहाआसनी रिक्षा एक हजारच्या वर आहेत. या शहराच्या सर्व भागात प्रवासी वाहतूक करीत आहेत. यातील अनेक रिक्षाचालकांनी अवैध प्रवासी वाहतूक केल्याशिवाय रिक्षा वाहतूक करूच शकत नाही, असे सांगून सर्वांचे हप्ते ठरलेले असतात. मालकाला द्यावे लागणारे दररोजच्या शिफ्टचे पैसे व पोलिसांना द्यावा लागणारा हप्ता यामुळे अवैध वाहतूक करावी लागते, असे अनेकांचे म्हणणे आहे.