शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहरात गडगडाटासह पाऊस

By admin | Updated: June 6, 2016 00:31 IST

ढगाळ वातावरण, उकाडा, गारवा आणि ऊन असे दिवसभर वातावरण होते. रात्री गडगडाटासह पावसाने हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिला. त्यामुळे रात्री वातावरणात गारवा निर्माण झाला.

पिंपरी : ढगाळ वातावरण, उकाडा, गारवा आणि ऊन असे दिवसभर वातावरण होते. रात्री गडगडाटासह पावसाने हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिला. त्यामुळे रात्री वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे काही भागातील वीज खंडित झाली. पावसाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. रविवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशी ढगाळ वातावरण होते. काही काळ ऊन आणि परत काळे ढग असे दिवसभर संमिश्र वातावरण होते. काल शनिवारी रात्री एकच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह पावसाने तासभर हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांतील वीज खंडित झाली होती. आज दुसऱ्या दिवशी रात्री नऊच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. गडगडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे रस्ते ओस पडले. काही सखल भागात पाणी साचले. काही वेळ हजेरी लावून पाऊस गेला. यामुळे काही भागातील वीज खंडित झाली होती. बाजारपेठेतील दुकानदार आणि विक्रेत्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. या आल्हादायक वातावरणात फिरण्याचा आनंद काहींनी लुटला. (प्रतिनिधी)महावितरण नॉट रिचेबलरात्रीच्या वेळी अचानक विद्युतपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. काही सुज्ञ नागरिकांनी महावितरणच्या लँडलाईन नंबरची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो लागत नव्हता. याबाबत काही नागरिकांनी वरिष्ठांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अनेक भागात शनिवारी रात्री विजपुरवठा नव्हता. या भागामध्ये असलेल्या रुग्णालयातील रुग्णांचीही गैरसोय झाली. महावितरणने विद्युततारा भूमिगत करणे गरजेचे आहे. परंतु, याकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याने अशा समस्यांचा सामना शहरातील अनेक भागामध्ये कराव लागतो. या भागातील विद्युततारा भूमिगत करण्यात याव्यात, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे. काही भागामध्ये विद्युत पुरवठा कमी जास्त होत असल्याने विद्युत उपकरणे जळली असल्याचीही तक्रार नागरिकांनी केली आहे. महावितरणने पावसाळ्यापूर्वी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.खंडित वीज पुरवठ्याने उडवली निगडीकरांची झोपनिगडी : पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या निगडीकरांना पूर्वमौसमी पावसाने शनिवारी दिलासा दिला़ पण, पाऊस सुरू होताच जवळपास अर्ध्या निगडीतील वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांची झोप उडाली़ शनिवारी दिवसभर आकाश ढगाळ होते़ पाऊस येईल असे वाटत असताना आकाश निरभ्र होत असे़ हवेतील आर्द्रताही वाढल्याने दिवसभर उकाडा जाणवत होता़ मध्यरात्री साडेबारानंतर काही भागात पावसाची एखादी सर येत होती़ नंतर दोनच्या सुमारास शहरात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात झाली़ जसा पाऊस सुरु झाला त्याच वेळी अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला़ एका बाजूला पावसाचा आवाज आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने गाढ झोपेत असलेल्या शहरवासीयांना जाग आली़