शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीचे काम होऊनही राडारोडा पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 03:03 IST

दिघीतील समस्या : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहनचालकांसह नागरिक त्रस्त

दिघी : परिसरातील आदर्शनगर सर्व्हे क्रमांक ७४ मध्ये वीस दिवसांपूर्वी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले होते. जेसीबीच्या साह्याने खोदकाम करून जलवाहिनी टाकण्याकरिता चर खोदण्याचे काम अगोदर करण्यात आले. परंतु ते होत असताना विद्युतपुरवठा खंडित होणे, गटारीच्या पाण्याची दुर्गंधी व नळजोड तोडल्याने पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण अशा उद्भवलेल्या

समस्यांनी स्थानिकांची डोकेदुखी वाढली होती. लोकमत पाहणीतून ही बाब निदर्शनास आली. कधी एकदाचे काम संपणार व आपली सुटका होणार अशी बिकट अवस्था दिघीकरांची झाली होती. मात्र जलवाहिनीचे काम संपून आठवडा झाला, तरी आदर्शनगरमधील रस्त्यावर पडलेला राडारोडा तसाच असून, रस्ता बंद झाला आहे. आबालवृद्धांना अडचणींशी सामना करावा लागत असून, दिघीकरांचा मनस्ताप व वाढलेली डोकेदुखी संपली नसल्याचे वास्तव आहे.जलवाहिनीचे काम संपून आठवडा झाला, तरी रस्त्यावरील राडारोडा, पडलेले खड्डे, उंच मातीचे ढिगारे तसेच आहेत. त्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लहान मुलांना खेळायला जागा शिल्लक नाही, तर दुचाकी लावायला जागा नसल्यामुळे त्या रस्त्यावर येत आहेत. ज्येष्ठांना चालण्याइतपतही रस्ता नीट नसून, दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे. काम झाल्यानंतर कंत्राटदाराने रस्त्यावर पडलेला राडा उचलणे आवश्यक होते; मात्र त्यांनी फिरूनही पाहिले नसल्याचे नागरिक सांगतात. प्रशासनसुद्धा वेळकाढूपणा करून सामान्यांना वेठीस धरीत आहे.साहेब आले व गेलेसुद्धा!दिघीतील पाणी समस्येवरून स्थानिक नगरसेवक व पाणीपुरवठा विभागाचे घमासान सुरू आहे. अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे सूर हवेत विरले नाहीत, तोच लोकप्रतिनिधींनी दिघीतील गणेशनगर भागात पाहणी केली. त्यामुळे आदर्शनगर भागालाही भेट देऊन येथील समस्या संबंधित लोकप्रतिनिधी जाणून घेतील, अशी अपेक्षा स्थानिकांना होती़ मात्र तसे काही घडले नाही. साहेब आले व गेलेसुद्धा! वास्तविक आदर्शनगरमधील समस्या लोकप्रतिनिधींच्या कानावर गेल्या असल्याचे प्रत्यक्ष भेटायला गेलेल्यांनी सांगितले. शिवाय त्यांचा प्रतिनिधी सोबत येऊन बघून गेला व उद्या सर्व राडारोडा उचलायला लावतो म्हणून सांगून गेला, अशी माहिती नागरिकांनी दिली. मात्र अद्याप कोणीही आले नसल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली. आमच्याकडे लक्ष द्या, अशी साद आता आदर्शनगरवासीयांनी घातली आहे.१जलवाहिनीचे काम सुरू झाल्यानंतर कंत्राटदारांच्या कामाच्या पद्धतीवर सर्वप्रथम नागरिकांनी आक्षेप घेतला होता. कारण यापूर्वी चोवीस तास पाणी योजना व भूमिगत केबलची कामे पूर्ण झाली होती. नागरिकांनी कामगारांना वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू ठेवले. त्यामुळे या झालेल्या कामांची वाट लागली.२ मलनिस्सारण वाहिनीची तोडफोड झाली. घाण पाणी तुंबल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे रोज नवीन समस्या निर्माण होत गेल्या व त्याचा त्रास मात्र सामान्य जनतेला सहन करावा लागला होता. खोदकामात निघालेला राडारोडा लवकर उचलून रस्ता मोकळा करण्याची विनंती नागरिकांनी केली. मात्र त्यास कोणीही प्रतिसाद दिला नाही. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड