शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

पाणीटंचाईचे संकट टळणार

By admin | Updated: May 6, 2015 06:08 IST

टंचाईचे संकट गडद होत असतानाच पिंपरी - चिंचवड शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पवना धरणात ४ मेअखेर ९५.८० दशलक्ष घनमीटर (दलघमी) म्हणजेच ३९.७६ टक्के साठा शिल्लक आहे.

पिंपरी : टंचाईचे संकट गडद होत असतानाच पिंपरी - चिंचवड शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पवना धरणात ४ मेअखेर ९५.८० दशलक्ष घनमीटर (दलघमी) म्हणजेच ३९.७६ टक्के साठा शिल्लक आहे. मागील वर्षापेक्षा हे पाणी अधिक आहे. आंद्रा धरणात ५६.१७ दलघमी (६७.६६ टक्के) पाणी उरले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे पाणी दहा टक्क्यांहून अधिक असून, शहरवासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे. पवना धरणाची साठवणूक क्षमता २७३.८५ दलघमी (९.६७ टीएमसी) आहे. मागील वर्षी याच कालावधीपर्यंत धरणात ८३.८५ दलघमी पाणी शिल्लक होते. त्यातच पाऊस लांबल्याने पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली होती. मात्र, या वर्षी अवकाळी पावसाची शेतकऱ्यांवर अवकृपा झाली असली, तरी धरणातील पाणीसाठा वाढण्यात त्यामुळे मदत झाली आहे. त्यामुळे धरणात ४ मेपर्यंत ९५.८० दलघमी पाणी आहे. इतर धरणांमध्येही पुरेसे पाणी आहे. पाऊस वेळेत झाल्यास शहराला पाण्याचा तुटवडा भासणार नसल्याची परिस्थती आहे. त्यातच मंगळवारी पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळण्याचे चित्र तयार झाले आहे.(प्रतिनिधी)धरणपाणी दलघमीत टक्केवारीमागील वर्षाचा साठा(कंसात टीएमसीत)(दलघमीत)पवना९५.८० (३.३८)३९.७६८३.८५वडिवळे१८.२९ (०.६६)६०.१८११.६२आंद्रा५६.१७ (१.९८)६७.८८४६.७५कुसगाव७.७१ (०.२७)४८.०१५.४९मुळशी९८.८१ (३.४९)१८.९०९३.३०