शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार

By admin | Updated: July 8, 2016 03:55 IST

पावसाळा सुरू झाल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज असून, पूरस्थिती आणि पूरनियंत्रणासाठीच्या उपाययोजन केल्या असून, त्यासाठीचे कक्ष एक जूनपासून कार्यरत आहेत.

पिंपरी : पावसाळा सुरू झाल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज असून, पूरस्थिती आणि पूरनियंत्रणासाठीच्या उपाययोजन केल्या असून, त्यासाठीचे कक्ष एक जूनपासून कार्यरत आहेत. सहाही प्रभागांत याविषयीचा कक्ष सुरू आहे. पूरस्थितीसंदर्भात नदीकाठच्या नागरिकांना वेळोवेळी सूचना केल्या जातील, असे सांगत होत्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या सहायक आयुक्त आशादेवी दुर्गुडे. महापालिकेने केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाविषयी सांगा.पिंपरी-चिंचवड महापालिकेने पूरनियंत्रणासाठी आराखडा तयार केला आहे. त्याविषयीची बैठक मे महिन्यात झाली होती. त्यासाठी प्रभाग अधिकारी, स्थापत्य विभाग, अग्निशमन, वैद्यकीय, पाणीपुरवठा, पर्यावरण विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनाबाबत सूचना केल्या आहेत. जून ते सप्टेंबर या तीन महिन्यांसाठी पूरनियंत्रण कंट्रोल रूम तयार केली आहे. त्या संदर्भात कक्षाचे दूरध्वनी क्रमांकही देण्यात आले आहेत. पूरनियंत्रण कृतिआराखडा काय आहे?आपल्या शहरातून पवना, मुळा, इंद्रायणी या तीन नद्या जातात. पूरस्थिती निर्माण होऊ नये किंवा निर्माण झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासाठी कृतिआराखडा तयार केला होता. त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सूचना देण्यात येतात. ब, क, ड या प्रभागाच्या परिसरातून नद्या वाहतात. त्या नद्यांच्या परिसरातील नाल्यांची सफाई करणे, तसेच बॅक वॉटरमुळे किंवा पुरामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरू नये, याविषयीच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच अग्निशमन विभागही सेवेसाठी सज्ज आहे. या आराखड्यात विविध विभागांचे अधिकारी, त्यांची जबाबदारी आणि त्यांनी करावयाच्या उपाययोजना यांबाबत सूचना केलेल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे काढणे, संक्रमण शिबिर इमारतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, नदीकाठावर फ्लड लाइटची व्यवस्था करणे आदींबाबत आयुक्तांनी केलेल्या सूचनांनुसार काम पूर्ण झालेले आहे. संभाव्य पुराचा धोका ओळखून नियोजन केले आहे.पूरस्थितीविषयीची मार्गदर्शक तत्त्वे काय?पूरस्थितीविषयी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने नदीतील पाण्याची पातळी ठरवून दिलेली आहे. पाच हजार ते दहा हजार क्युसेक पाणी ही सामान्य पातळी असून, २० हजार क्युसेक नदीत पाणी आले, तर अलर्ट लेव्हल मानली जाते. त्यापेक्षा ३५ किंवा ५५ क्युसेक पाण्याची पातळी वाढली. धोकादायक परिस्थिती मानली जाते. नदीपात्रालगत असणाऱ्या झोपड्यांच्या परिसरात पाणी शिरण्यापूर्वी तेथील नागरिकांना स्थलांतरित करून सुरक्षित ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जाते. यासाठी पूरनियंत्रण कक्ष कार्यरत झाला आहे. नागरिकांनी दक्षता कोणती घ्यावी?आपल्या शहरातून तीन नद्या जातात. पवना नदीवर पवनानगर येथे धरण आहे. तसेच इंद्रायणी आणि मुळा नदीवरही धरणे आहेत. पावसाचे प्रमाण अधिक राहिल्यास जलसंपदा विभागाकडून महापालिकेच्या पूरनियंत्रण कक्षाला सूचना दिल्या जातात. धरणात वाढणारे पाणी याबाबतची माहिती रोजच्या रोज कळविली जाते. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी किमान तीन तास अगोदर सूचना दिल्या जातात. अशा प्रकारच्या सूचना आल्या की, नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सूचना दिल्या जातात. वेळप्रसंगी रिक्षाद्वारे ध्वनिवर्धकावरून माहिती पुरविली जाते. पूरनियंत्रणासाठी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. पूरस्थितीबाबत नागरिकांनी जागरूक राहून मिळणारी माहिती महापालिकेपर्यंत पोहोचवावी.