शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार

By admin | Updated: July 8, 2016 03:55 IST

पावसाळा सुरू झाल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज असून, पूरस्थिती आणि पूरनियंत्रणासाठीच्या उपाययोजन केल्या असून, त्यासाठीचे कक्ष एक जूनपासून कार्यरत आहेत.

पिंपरी : पावसाळा सुरू झाल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज असून, पूरस्थिती आणि पूरनियंत्रणासाठीच्या उपाययोजन केल्या असून, त्यासाठीचे कक्ष एक जूनपासून कार्यरत आहेत. सहाही प्रभागांत याविषयीचा कक्ष सुरू आहे. पूरस्थितीसंदर्भात नदीकाठच्या नागरिकांना वेळोवेळी सूचना केल्या जातील, असे सांगत होत्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या सहायक आयुक्त आशादेवी दुर्गुडे. महापालिकेने केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाविषयी सांगा.पिंपरी-चिंचवड महापालिकेने पूरनियंत्रणासाठी आराखडा तयार केला आहे. त्याविषयीची बैठक मे महिन्यात झाली होती. त्यासाठी प्रभाग अधिकारी, स्थापत्य विभाग, अग्निशमन, वैद्यकीय, पाणीपुरवठा, पर्यावरण विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनाबाबत सूचना केल्या आहेत. जून ते सप्टेंबर या तीन महिन्यांसाठी पूरनियंत्रण कंट्रोल रूम तयार केली आहे. त्या संदर्भात कक्षाचे दूरध्वनी क्रमांकही देण्यात आले आहेत. पूरनियंत्रण कृतिआराखडा काय आहे?आपल्या शहरातून पवना, मुळा, इंद्रायणी या तीन नद्या जातात. पूरस्थिती निर्माण होऊ नये किंवा निर्माण झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासाठी कृतिआराखडा तयार केला होता. त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सूचना देण्यात येतात. ब, क, ड या प्रभागाच्या परिसरातून नद्या वाहतात. त्या नद्यांच्या परिसरातील नाल्यांची सफाई करणे, तसेच बॅक वॉटरमुळे किंवा पुरामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरू नये, याविषयीच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच अग्निशमन विभागही सेवेसाठी सज्ज आहे. या आराखड्यात विविध विभागांचे अधिकारी, त्यांची जबाबदारी आणि त्यांनी करावयाच्या उपाययोजना यांबाबत सूचना केलेल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे काढणे, संक्रमण शिबिर इमारतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, नदीकाठावर फ्लड लाइटची व्यवस्था करणे आदींबाबत आयुक्तांनी केलेल्या सूचनांनुसार काम पूर्ण झालेले आहे. संभाव्य पुराचा धोका ओळखून नियोजन केले आहे.पूरस्थितीविषयीची मार्गदर्शक तत्त्वे काय?पूरस्थितीविषयी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने नदीतील पाण्याची पातळी ठरवून दिलेली आहे. पाच हजार ते दहा हजार क्युसेक पाणी ही सामान्य पातळी असून, २० हजार क्युसेक नदीत पाणी आले, तर अलर्ट लेव्हल मानली जाते. त्यापेक्षा ३५ किंवा ५५ क्युसेक पाण्याची पातळी वाढली. धोकादायक परिस्थिती मानली जाते. नदीपात्रालगत असणाऱ्या झोपड्यांच्या परिसरात पाणी शिरण्यापूर्वी तेथील नागरिकांना स्थलांतरित करून सुरक्षित ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जाते. यासाठी पूरनियंत्रण कक्ष कार्यरत झाला आहे. नागरिकांनी दक्षता कोणती घ्यावी?आपल्या शहरातून तीन नद्या जातात. पवना नदीवर पवनानगर येथे धरण आहे. तसेच इंद्रायणी आणि मुळा नदीवरही धरणे आहेत. पावसाचे प्रमाण अधिक राहिल्यास जलसंपदा विभागाकडून महापालिकेच्या पूरनियंत्रण कक्षाला सूचना दिल्या जातात. धरणात वाढणारे पाणी याबाबतची माहिती रोजच्या रोज कळविली जाते. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी किमान तीन तास अगोदर सूचना दिल्या जातात. अशा प्रकारच्या सूचना आल्या की, नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सूचना दिल्या जातात. वेळप्रसंगी रिक्षाद्वारे ध्वनिवर्धकावरून माहिती पुरविली जाते. पूरनियंत्रणासाठी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. पूरस्थितीबाबत नागरिकांनी जागरूक राहून मिळणारी माहिती महापालिकेपर्यंत पोहोचवावी.