शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रिंगरोडमधील बाधितांचे नाही सर्वेक्षण

By admin | Updated: July 8, 2017 02:25 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरणाकडून रिंगरोडमधील बांधकामे हटविण्याची कारवाई सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरणाकडून रिंगरोडमधील बांधकामे हटविण्याची कारवाई सुरू झाली आहे. महापालिका आणि प्राधिकरण परिसरात किती बांधकामे बाधित होणार आहेत, याची माहिती प्रशासनाकडे नाही. तीस वर्षांनंतर हा रिंगरोड आवश्यक आहे का? हाही संशोधनाचा विषय आहे. बाधितांचे सर्वेक्षण आणि पुनर्वसन न करताच रिंगरोडच्या भूसंपादनाची घाई सुरू झाली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आराखडा करण्यात आला. तसेच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना केल्यानंतर दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रस्तावित रिंगरोडचे नियोजन केले होते. सुमारे तीस वर्षांपूर्वी रिंगरोडचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही प्रशासनांनी रिंगरोडच्या जागेचा ताबा घेतला नाही. त्यामुळे या प्रस्तावित रस्त्याबाबत संदिग्धता होती. तसेच यासंदर्भातील आरक्षण फक्त प्रस्तावित केले मात्र, त्यानंतरची कारवाई आजपर्यंत प्रशासनाने केलीच नाही. परिणामी संबंधित जागांवर नागरिकांनी घरे उभारली. तीस वर्षांनंतर रिंगरोड निर्माण करण्याचे धोरण सत्ताधाऱ्यांनी आखले आहे. त्यानुसार काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, चिंचवड परिसरातून कारवाई सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात रहाटणी आणि काळेवाडीतील काही भागांतील भूसंपादन केले आहे. कारवाईच्या भीतीने नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.१५०० नागरिक विस्थापिततीस वर्षांनी रिंगरोड भूसंपादनाची कारवाई सुरू झाली आहे, त्यामुळे थेरगाव आणि चिंचवड परिसरात या रस्त्यामुळे सुमारे तीन हजार कुटुंबे म्हणजे सुमारे पंधरा हजार नागरिक विस्थापित होणार आहेत. या रस्त्याची आवश्यकता आहे का? असा प्रश्न नागरिक सत्ताधाऱ्यांना विचारत आहेत.नेत्यांनी अभ्यास करावासामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले, ‘‘तीस वर्षांनंतर रस्ता करण्याचा घाट घातला जात आहे. सत्तेच्या जोरावर नागरिकांच्या घरावर बुलडोजर फिरविला जात आहे. आता या रस्त्याची गरज आहे का? कितीपत आवश्यकता आहे. केवळ राजकीय उद्देशातून केला जात आहे. याबाबत सर्व राजकीय पक्षांनी अभ्यास करून नागरिकांच्या हिताचा निर्णय घेणे अपेक्षित आहे.