शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

रिंगरोडमधील बाधितांचे नाही सर्वेक्षण

By admin | Updated: July 8, 2017 02:25 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरणाकडून रिंगरोडमधील बांधकामे हटविण्याची कारवाई सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरणाकडून रिंगरोडमधील बांधकामे हटविण्याची कारवाई सुरू झाली आहे. महापालिका आणि प्राधिकरण परिसरात किती बांधकामे बाधित होणार आहेत, याची माहिती प्रशासनाकडे नाही. तीस वर्षांनंतर हा रिंगरोड आवश्यक आहे का? हाही संशोधनाचा विषय आहे. बाधितांचे सर्वेक्षण आणि पुनर्वसन न करताच रिंगरोडच्या भूसंपादनाची घाई सुरू झाली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आराखडा करण्यात आला. तसेच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना केल्यानंतर दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रस्तावित रिंगरोडचे नियोजन केले होते. सुमारे तीस वर्षांपूर्वी रिंगरोडचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही प्रशासनांनी रिंगरोडच्या जागेचा ताबा घेतला नाही. त्यामुळे या प्रस्तावित रस्त्याबाबत संदिग्धता होती. तसेच यासंदर्भातील आरक्षण फक्त प्रस्तावित केले मात्र, त्यानंतरची कारवाई आजपर्यंत प्रशासनाने केलीच नाही. परिणामी संबंधित जागांवर नागरिकांनी घरे उभारली. तीस वर्षांनंतर रिंगरोड निर्माण करण्याचे धोरण सत्ताधाऱ्यांनी आखले आहे. त्यानुसार काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, चिंचवड परिसरातून कारवाई सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात रहाटणी आणि काळेवाडीतील काही भागांतील भूसंपादन केले आहे. कारवाईच्या भीतीने नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.१५०० नागरिक विस्थापिततीस वर्षांनी रिंगरोड भूसंपादनाची कारवाई सुरू झाली आहे, त्यामुळे थेरगाव आणि चिंचवड परिसरात या रस्त्यामुळे सुमारे तीन हजार कुटुंबे म्हणजे सुमारे पंधरा हजार नागरिक विस्थापित होणार आहेत. या रस्त्याची आवश्यकता आहे का? असा प्रश्न नागरिक सत्ताधाऱ्यांना विचारत आहेत.नेत्यांनी अभ्यास करावासामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले, ‘‘तीस वर्षांनंतर रस्ता करण्याचा घाट घातला जात आहे. सत्तेच्या जोरावर नागरिकांच्या घरावर बुलडोजर फिरविला जात आहे. आता या रस्त्याची गरज आहे का? कितीपत आवश्यकता आहे. केवळ राजकीय उद्देशातून केला जात आहे. याबाबत सर्व राजकीय पक्षांनी अभ्यास करून नागरिकांच्या हिताचा निर्णय घेणे अपेक्षित आहे.