शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही मूल्यांच्या जागृतीची गरज

By admin | Updated: November 16, 2015 01:47 IST

गेल्या वर्षभरात पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, डॉ. अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी जास्तच चर्चा घडविली जात आहे.

पिंपरी : गेल्या वर्षभरात पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, डॉ. अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी जास्तच चर्चा घडविली जात आहे. त्यातून नेहरू आणि काँग्रेसविषयी द्वेष पसरविण्याचा आणि इतिहास बदलून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा हल्ला परतवून लावण्याची व नेहरू, गांधींच्या लोकशाही मूल्ल्यांची माहिती समाजात देऊन जागृती निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी चिंचवड येथे केले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि आद्य क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पार्टीच्या वतीने चिंचवड चापेकर चौकातील पक्ष कार्यालयातील कार्यक्रमात महाजन बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष सचिन साठे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला शहराध्यक्षा ज्योती भारती, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष संदेश नवले, पर्यावरण सेलचे अध्यक्ष अशोक मोरे, चिंतामणी सोंडकर, मयूर जैसवाल, संकेत जगताप, हरी नायर, बाबासाहेब बनसोडे, एनएसयूआय सरचिटणीस विशाल कसबे, वर्षा झपके, बिंदू तिवारी, सुनेत्रा पवार, सुनील राऊत, जनार्दन पोलकडे, रियाज शेख, वीरेंद्र गायकवाड, आबा खराडे आदी उपस्थित होते. महाजन म्हणाले, ‘‘नेहरू यांनी देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून जेव्हा शपथ घेतली, तेव्हा धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्था निर्माण करणे, हे त्यांच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान होते. नेहरू संसदेत नेहमी हजेरी लावत. संसदेविषयी लोकांमध्ये आदर व सन्मान निर्माण होईल, असे त्यांचे वर्तन होते. सहिष्णुतेचे मूल्य बाळगणाऱ्या नेहरूंनी आपल्या भिन्न विचारांच्या विरोधकांविषयीदेखील कधीही कटुता बाळगली नाही. राम मनोहर लोहिया व नेहरू प्रथमत: एकत्र होते. परंतु, नंतर लोहिया विरोधात गेले. तरीही नेहरूंनी त्यांच्यावर कधीही व्यक्तिगत टीका केली नाही. न्याय्य मार्गाने, न्यायपूर्व धर्म मार्गाने, धर्मनिरपेक्ष समाज निर्माण करणे, हे महात्मा गांधीचे स्वप्न नेहरूंनी सत्यात आणले.’’ (प्रतिनिधी)