शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लोकशाही मूल्यांच्या जागृतीची गरज

By admin | Updated: November 16, 2015 01:47 IST

गेल्या वर्षभरात पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, डॉ. अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी जास्तच चर्चा घडविली जात आहे.

पिंपरी : गेल्या वर्षभरात पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, डॉ. अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी जास्तच चर्चा घडविली जात आहे. त्यातून नेहरू आणि काँग्रेसविषयी द्वेष पसरविण्याचा आणि इतिहास बदलून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा हल्ला परतवून लावण्याची व नेहरू, गांधींच्या लोकशाही मूल्ल्यांची माहिती समाजात देऊन जागृती निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी चिंचवड येथे केले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि आद्य क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पार्टीच्या वतीने चिंचवड चापेकर चौकातील पक्ष कार्यालयातील कार्यक्रमात महाजन बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष सचिन साठे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला शहराध्यक्षा ज्योती भारती, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष संदेश नवले, पर्यावरण सेलचे अध्यक्ष अशोक मोरे, चिंतामणी सोंडकर, मयूर जैसवाल, संकेत जगताप, हरी नायर, बाबासाहेब बनसोडे, एनएसयूआय सरचिटणीस विशाल कसबे, वर्षा झपके, बिंदू तिवारी, सुनेत्रा पवार, सुनील राऊत, जनार्दन पोलकडे, रियाज शेख, वीरेंद्र गायकवाड, आबा खराडे आदी उपस्थित होते. महाजन म्हणाले, ‘‘नेहरू यांनी देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून जेव्हा शपथ घेतली, तेव्हा धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्था निर्माण करणे, हे त्यांच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान होते. नेहरू संसदेत नेहमी हजेरी लावत. संसदेविषयी लोकांमध्ये आदर व सन्मान निर्माण होईल, असे त्यांचे वर्तन होते. सहिष्णुतेचे मूल्य बाळगणाऱ्या नेहरूंनी आपल्या भिन्न विचारांच्या विरोधकांविषयीदेखील कधीही कटुता बाळगली नाही. राम मनोहर लोहिया व नेहरू प्रथमत: एकत्र होते. परंतु, नंतर लोहिया विरोधात गेले. तरीही नेहरूंनी त्यांच्यावर कधीही व्यक्तिगत टीका केली नाही. न्याय्य मार्गाने, न्यायपूर्व धर्म मार्गाने, धर्मनिरपेक्ष समाज निर्माण करणे, हे महात्मा गांधीचे स्वप्न नेहरूंनी सत्यात आणले.’’ (प्रतिनिधी)