शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही मूल्यांच्या जागृतीची गरज

By admin | Updated: November 16, 2015 01:47 IST

गेल्या वर्षभरात पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, डॉ. अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी जास्तच चर्चा घडविली जात आहे.

पिंपरी : गेल्या वर्षभरात पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, डॉ. अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी जास्तच चर्चा घडविली जात आहे. त्यातून नेहरू आणि काँग्रेसविषयी द्वेष पसरविण्याचा आणि इतिहास बदलून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा हल्ला परतवून लावण्याची व नेहरू, गांधींच्या लोकशाही मूल्ल्यांची माहिती समाजात देऊन जागृती निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी चिंचवड येथे केले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि आद्य क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पार्टीच्या वतीने चिंचवड चापेकर चौकातील पक्ष कार्यालयातील कार्यक्रमात महाजन बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष सचिन साठे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला शहराध्यक्षा ज्योती भारती, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष संदेश नवले, पर्यावरण सेलचे अध्यक्ष अशोक मोरे, चिंतामणी सोंडकर, मयूर जैसवाल, संकेत जगताप, हरी नायर, बाबासाहेब बनसोडे, एनएसयूआय सरचिटणीस विशाल कसबे, वर्षा झपके, बिंदू तिवारी, सुनेत्रा पवार, सुनील राऊत, जनार्दन पोलकडे, रियाज शेख, वीरेंद्र गायकवाड, आबा खराडे आदी उपस्थित होते. महाजन म्हणाले, ‘‘नेहरू यांनी देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून जेव्हा शपथ घेतली, तेव्हा धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्था निर्माण करणे, हे त्यांच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान होते. नेहरू संसदेत नेहमी हजेरी लावत. संसदेविषयी लोकांमध्ये आदर व सन्मान निर्माण होईल, असे त्यांचे वर्तन होते. सहिष्णुतेचे मूल्य बाळगणाऱ्या नेहरूंनी आपल्या भिन्न विचारांच्या विरोधकांविषयीदेखील कधीही कटुता बाळगली नाही. राम मनोहर लोहिया व नेहरू प्रथमत: एकत्र होते. परंतु, नंतर लोहिया विरोधात गेले. तरीही नेहरूंनी त्यांच्यावर कधीही व्यक्तिगत टीका केली नाही. न्याय्य मार्गाने, न्यायपूर्व धर्म मार्गाने, धर्मनिरपेक्ष समाज निर्माण करणे, हे महात्मा गांधीचे स्वप्न नेहरूंनी सत्यात आणले.’’ (प्रतिनिधी)