शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

...तर माझी आई वाचली असती!

By admin | Updated: November 14, 2015 03:06 IST

‘चार महिन्यांपूर्वी वडिलांनी आईच्या तोंडात कापडी बोळा ठेवून गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. आजी अचानक त्या ठिकाणी आल्यामुळे आईचा जीव वाचला होता

पिंपरी : ‘चार महिन्यांपूर्वी वडिलांनी आईच्या तोंडात कापडी बोळा ठेवून गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. आजी अचानक त्या ठिकाणी आल्यामुळे आईचा जीव वाचला होता. त्या वेळी पोलिसांकडे तक्रार देण्याचे टाळले. वडिलांनी चार महिन्यांनी तेच केले. अखेर आईचा जीव गेला. वडिलांच्या विरोधात त्याच वेळी पोलिसांकडे तक्रार दिली असती, तर ही वेळ आली नसती,’ अशी भावना सूरज माने (वय १८) याने व्यक्त केली. चारित्र्याच्या संशयावरून चाकूने वार करून पत्नीचा खून करून पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी चिंचवड येथील इंदिरानगरमध्ये घडली. खूनप्रकरणी वडील अशोक माने यांच्या विरोधात मुलगा सूरजने फिर्याद दिली आहे.त्या वेळी सूरज म्हणाला, ‘‘इंदिरानगर झोपडपट्टीत ऐन दिवाळीत रक्ताचा सडा पडला. एकीकडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आई, दुसरीकडे स्वत:ला जखमी केलेले वडील, वस्तीत वर्दळीच्या ठिकाणी घडलेली घटना, धावत गेलो, पाहून अवसान गळाले, काय करावे सुचेना... कोणी तरी पोलिसांना कळविले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही रुग्णालयात नेले. उपचारापूर्वीच आई नीलाबाईने जीव सोडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चार महिन्यांपूर्वी नातवाईक तसेच जवळच्या लोकांनी वडिलांची समजूत घातली होती. वडिलांच्या वर्तणुकीत सुधारणा होईल, या अपेक्षेने मी पोलिसांकडे तक्रार देण्याचे टाळले होते. आॅगस्टमध्ये वडिलांनी आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी आजी तुकाबाईने दखल घेतल्याने आई बचावली. परंतु, चार महिन्यांनी तेच घडले.’’(प्रतिनिधी)