शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

हतबल पालक आणि बॉम्बवर मुले

By admin | Updated: August 7, 2015 00:37 IST

कितीही वाटले तरी आणि शाळा कितीही जवळ असली, तरी सध्या पालकांना स्वत: मुलांना शाळेत सोडणे शक्य होत नाही, हे घरोघरचे भेदक वास्तव! यामागची

कितीही वाटले तरी आणि शाळा कितीही जवळ असली, तरी सध्या पालकांना स्वत: मुलांना शाळेत सोडणे शक्य होत नाही, हे घरोघरचे भेदक वास्तव! यामागची काहीही कारणे असली, तरी काळजावर दगड ठेवून प्रत्येक पालक आपल्या मुलाला बसमध्ये सोडायला जातो. सकाळच्या वेळेत अर्धवट झोपेतील मूल पाठीवर काही किलोची सॅक आणि हातात टिफिनची बॅग सांभाळत बसमध्ये चढते...आणि हा हा म्हणता गर्दीत गायब होते. सगळ्याच मुलांचे गणवेश एकच असल्याने आपले मूल बसले आहे की उभेच आहे, हे समजत नाही. बस निघते. पाठमोऱ्या बसला उगीचच हात हलवून प्रत्येक जण (यामध्ये बहुतांश आया) आपल्या मुलाला निरोप देतात. बसमधील गर्दीने प्रत्येक मुलाचा श्वास कोंडलेला असतो. रस्त्यावरील खड्डे, गतिरोधक, वळण, साधा ब्रेक, अचानक ब्रेक, फर्स्ट गिअर...प्रत्येक वेळी मुले एकमेकांवर आदळत-कोसळत शाळेपर्यंत पोहोचतात. शाळा सुटल्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास; पण चेहऱ्यावर थोडा आनंद, कारण घरी जायचे असते.शाळांना द्यावे लागते महिन्याचे भाडेशाळांची साखळी असणाऱ्या शिक्षणसंस्थांची स्वत:ची वाहतूक यंत्रणा आहे. ते मनमानी भाडेआकारणी करतात. हे उत्पन्न संस्थेच्या तिजोरीत जाते. तर, छोट्या संस्था खासगी बस वाहतूकदारांचा आधार घेतात. या संस्था मोबदला म्हणून वर्षापैकी एक महिन्याचे भाडे घेऊन विद्यार्थी वाहतुकीस परवानगी देत असतात. पालकांकडून बाराही महिन्यांचे भाडेभाड्याचे टप्पेही मनमानी असतात. सर्वसाधारण एक ते चार किलोमीटरसाठी काही संस्था सातशे ते हजार भाडे आकारतात. शाळेपासून पाचशे मीटरवर विद्यार्थी असला, तरी सवलत नाही. दिवाळी, नाताळ, उन्हाळा सुटीचेही भाडे घेतले जाते. वर्षातील तीस टक्के दिवस शाळांना सुटी असते, तरीही पैसे उकळतात.समित्या कागदावरचमोटार वाहन नियमांतर्गत स्कूल बस सुरक्षितता समिती स्थापन करण्याची तरतूद आहे. पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर एक समिती स्थापन करावी. सहा महिन्यांतून एकदा आढावा बैठक होईल...परंतु, अशी समिती स्थापनच झालेली नाही, अशी धक्कादायक माहिती मिळाली.१‘पत्रकारिता परमो धर्म’ या उपक्रमानिमित्त ‘लोकमत टीम’ने शहरातील विविध शाळांच्या ठिकाणी जाऊन विद्यार्थी बस वाहतूक नेमकी कशी होती, याची पाहणी केली. यामध्ये ठळकपणे निदर्शनास आलेली बाब म्हणजे ‘हतबल पालक आणि बॉम्बवरील मुले’. रिक्षा, व्हॅन या शंभर टक्के अनधिकृत गॅस व कीट लावून विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. शाळांच्या बसला आजवर किरकोळ अपघात अनेक वेळा झाले आहेत. मात्र, परिस्थितीत सुधारणा नाहीत. ‘आरटीओ’ अधिकारी लक्ष देत नाहीत, वाहतूक पोलीस पाहणी करत नाहीत, शाळा म्हणते आमचा संबध नाही...मग पालकांनी पाहायचे कोणाकडे? दर वर्षी बस फीमध्ये वाढ ठरलेलीच. मुळात आहे तीच जादा; पण नाइलाजाने पालक ती भरतो. शाळांमधील पालकांच्या संघटना या शाळा प्रशासनाच्या दावणीला बांधलेल्या. आपल्या मूलाला त्रास होऊ नये यासाठी पालक शाळेकडे थेट तक्रार करायला धजावत नाहीत.२‘लोकमत टीम’ ज्या वेळी पालकांच्या प्रतिक्रिया घेऊ लागली, त्या वेळी शाळा आणि बस-व्हॅनविरोधात तक्रारींचा पाऊस पडला. पण, आमचे तेवढे नाव छापू नका, असाही एक सावध पवित्रा सर्वांचा होता. चालक म्हणतात, ‘मी पगार घेतो. बसचे कंत्राट शाळा आणि मालकामध्ये झालेले आहे.’ मालक म्हणतात, ‘डिझेलचे भाव अचानकच वाढतात. त्यामुळे फटका बसतो. स्पर्धेमुळे शाळांमधील अनेकांना कमिशन द्यावे लागते. बसमधून शिक्षकांना फुकट न्यावे लागते. शाळाच आम्हाला बदनाम करतात.’ असे सगळे जण ‘तो मी नव्हेच’!नोकरीमुळे पालकांचा नाइलाज... नोकरीमुळे मुलांना शाळेत सोडविणे जमत नाही. त्यामुळे शाळांच्या अथवा खासगी वाहनांमध्ये गर्दी असली, तरी आमचा नाइलाज आहे. मात्र, शाळांनी याबाबत दखल घ्यायला हवी. खासगी बसचालक व रिक्षाचालक यांची दर आठवड्याला बैठक घ्यायला हवी. यामुळे पालक व शाळाही निश्चिंत राहतील. मुलांबाबत सुरक्षितता वाटेल. याबाबत शाळांनी नियमावली तयार करायला हवी. महाराष्ट्र स्तरावर हा विषय सर्व ठिकाणी हाताळायला हवा.- अजय अंगरख, पिंपरी