शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पूल पाण्याखाली गेल्याने गैरसोय

By admin | Updated: June 28, 2017 04:03 IST

रविवार पहाटेपासून पवन मावळात होत असलेल्या जोरदार पावसाने पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने

लोकमत न्यूज नेटवर्कगहुंजे : रविवार पहाटेपासून पवन मावळात होत असलेल्या जोरदार पावसाने पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सोमवारी रात्री गहुंजे-साळुंब्रे गावांना जोडणाऱ्या साकव पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पूल पाण्याखाली गेल्याने पंचक्रोशीतील शेतकरी व कामगार वर्गाची मोठी गैरसोय झाली आहे. पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असल्याने मंगळवारी सकाळी घराबाहेर पडलेल्या शेतकरी व कामगारांना ९-१० किलोमीटरचा वळसा घालून घरी जावे लागले. तसेच शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय वाढली असून पायपीट वाढली आहे. नवीन पूल बांधण्यासाठी शासनाला जाग कधी येणार, असा सवाल स्थानिकांतून उपस्थित केला जात आहे. गहुंजे - साळुंब्रे साकव पूल पाण्याखाली गेल्याने सोमवारपासून गहुंजे, मामुर्डी, रावेत, देहूरोड, किवळे, विकासनगर आदी भागातील विद्यार्थ्यांना साळुंब्रेतील ग्रामप्रबोधिनी विद्यालयात येण्या-जाण्यासाठी सोमाटणे फाटा मार्गे नऊ -दहा किलोमीटरचा वळसा घालून जावे लागणार आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात शाळा महाविद्यालयात येणारे विद्यार्थी औद्योगिक क्षेत्रात जाणारे कामगार, भाजी मंडई तरकारी, फुले घेऊन येणारे शेतकरी, दूध व्यावसायिक व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. सर्वांना सुमारे दहा किलोमीटरचा वळसा घालून ये-जा करावी लागत आहे.