शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

पूल पाण्याखाली गेल्याने गैरसोय

By admin | Updated: June 28, 2017 04:03 IST

रविवार पहाटेपासून पवन मावळात होत असलेल्या जोरदार पावसाने पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने

लोकमत न्यूज नेटवर्कगहुंजे : रविवार पहाटेपासून पवन मावळात होत असलेल्या जोरदार पावसाने पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सोमवारी रात्री गहुंजे-साळुंब्रे गावांना जोडणाऱ्या साकव पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पूल पाण्याखाली गेल्याने पंचक्रोशीतील शेतकरी व कामगार वर्गाची मोठी गैरसोय झाली आहे. पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असल्याने मंगळवारी सकाळी घराबाहेर पडलेल्या शेतकरी व कामगारांना ९-१० किलोमीटरचा वळसा घालून घरी जावे लागले. तसेच शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय वाढली असून पायपीट वाढली आहे. नवीन पूल बांधण्यासाठी शासनाला जाग कधी येणार, असा सवाल स्थानिकांतून उपस्थित केला जात आहे. गहुंजे - साळुंब्रे साकव पूल पाण्याखाली गेल्याने सोमवारपासून गहुंजे, मामुर्डी, रावेत, देहूरोड, किवळे, विकासनगर आदी भागातील विद्यार्थ्यांना साळुंब्रेतील ग्रामप्रबोधिनी विद्यालयात येण्या-जाण्यासाठी सोमाटणे फाटा मार्गे नऊ -दहा किलोमीटरचा वळसा घालून जावे लागणार आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात शाळा महाविद्यालयात येणारे विद्यार्थी औद्योगिक क्षेत्रात जाणारे कामगार, भाजी मंडई तरकारी, फुले घेऊन येणारे शेतकरी, दूध व्यावसायिक व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. सर्वांना सुमारे दहा किलोमीटरचा वळसा घालून ये-जा करावी लागत आहे.