शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

लोहगडावरील सुरक्षेकडे होतेय दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:51 IST

मागील काही वर्षांमध्ये मावळातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचे लोंढे च्या लोंढे येत असून, त्यात लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची संख्या मोठी वाढली आहे.

कामशेत : मागील काही वर्षांमध्ये मावळातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचे लोंढे च्या लोंढे येत असून, त्यात लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची संख्या मोठी वाढली आहे. पण त्यादृष्टीने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे.इतिहासाची साक्ष देत उभा असलेल्या लोहगड किल्ल्यावर जाणाºया रस्त्याची गेल्या काही वर्षांमध्ये चांगली सुधारणा झाली असून, इतर अनेक सोईंमुळे किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. एरव्ही एकटा असणाºया या गडावर इतिहास प्रेमी, शिवप्रेमी, गड किल्ल्यांचेसंवर्धन करणाºया विविध संस्थांचे सभासद येत असत. पण मागीलकाही वर्षांमध्ये वर्षविहारासाठी लोणावळा खंडाळ्यात दाखल होणाºया पर्यटकांना हा किल्ला खुणावू लागल्याने येथे शनिवार, रविवार व इतर सुटीच्या दिवशी मोठी गर्दी होत आहे.किल्ल्याच्या पायथ्याला विविध दुकाने थाटली गेली असून, खाद्य पदार्थांच्या गाड्या व इतर वस्तूच्या दुकानदारीमुळे स्थानिकांना मोठा रोजगार निर्माण झाला आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाच्या वतीने या किल्ल्यावर पाच गडपालकांची नेमणूक करण्यात आली आहे.मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने या किल्ल्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना नाही. दिवसभरात गडावर किती पर्यटक आले व त्यानंतर किती पर्यटक माघारी गेले, याची कोणत्याही प्रकारची नोंद येथे नसल्याने एखादा पर्यटक अनावधानाने रस्ता चुकून अथवा अपघात होऊन हरवला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.गडावर अनधिकृतपणे खाद्यपदार्थ बनवणे व विक्री करणे सुरू असून, गडावर गणेश दरवाजाच्या पुढील दरवाजाच्या दिवटीमध्ये हा व्यवसाय गडपाल यांच्या मर्जीने सुरू आहे. येथे वडापाव, चहा व इतर पदार्थ विकले जात आहेत.काही पर्यटक नागरिकांशीही हुल्लडबाजी करतात. भरधाववाहने चालवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची आवश्यकता आहे. परंतु प्रशासन त्या कडे दुर्लक्ष करीत असल्याने हुल्लडबाजांची स्टंटबाजी वाढत चालली आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, त्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल परिसरातील नागरिकांमधून विचारला जात आहे. प्रशासनाला जाग येणे गरजेचे आहे.