शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

गझल, कवितांनी रंगली मैफल

By admin | Updated: October 11, 2016 01:17 IST

गझला, साहित्यिक गप्पा, विनोद, कविता, लावणी, भक्तिगीत आणि आठवणी सांगत ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. ‘पिंपरी-चिंचवड साहित्य मंच’च्या वतीने

पिंपरी : गझला, साहित्यिक गप्पा, विनोद, कविता, लावणी, भक्तिगीत आणि आठवणी सांगत ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. ‘पिंपरी-चिंचवड साहित्य मंच’च्या वतीने बहारदार साहित्य मैफलीचे आयोजन शिवतेजनगर येथे करण्यात आले. शहरातील अनेक साहित्यिकांनी मैफलीत आपला सहभाग नोंदवला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. झुंजार सावंत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, ज्येष्ठ कवी अशोक कोठारी, समरसताचे अध्यक्ष रमेश वाकनीस हे उपस्थित होते. राजेंद्र घावटे यांनी प्रास्ताविक केले.शोभा जोशी यांच्या ‘गेल्या जत्रेत झाली आपली भेट, कारभारी आठवा की नीट’ या लावणीने सुरुवात झाली. धनेश बडवाने यांनी ‘बागेत चालताना नुसते प्रहार झाले’, रमेश वाकनीस यांनी ‘कहानी रही या जवानी रही, समयकी बडी मेहरबानी रही’, प्रदीप गांधलीकर यांनी ‘दु:ख हे नेहमी मजवरी भाळले, त्याचसाठी सुख मी तुज टाळले’, दिनेश भोसले यांनी ‘ सहजा सहजी मतला सुचला जाता जाता’, अशोक कोठारी यांनी ‘ प्रत्येक श्वास त्याला माझा सलाम आहे ’ , पीतांबर लोहार यांनी ‘आलीस तू अशी ती मी बावरून गेलो, आनंद हा मनाशी मी बावरून गेलो’, तर राजेंद्र घावटे यांनी, ‘आज कोणीही नव्या वाटेत प्रवासात नाही, आज ऊर्मी कोठलीही माझिया श्वासात नाही’ अशा सादर केलेल्या गझलांना दाद मिळाली. नंदकुमार मुरडे यांची ‘धर्मास सांधणारा माणूस शोधतो मी.. सत्यास मानणारा माणूस वंदितो मी’ही गझलही दाद मिळवून गेली. नितीन हिरवे, सुभाष चव्हाण, सुप्रिया सोलांकुरे यांनी अनेक प्रसंग, नामवंतांचे साहित्य, साहित्यिक अभिरुची आणि आठवणी कथनाद्वारे कार्यक्रमात रंगत आणली. सूत्रसंचालन प्रदीप गांधलीकर यांनी केले. आभार प्रदर्शन जयश्री घावटे यांनी केले.(प्रतिनिधी)