शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

बालहक्कांसाठी लढणाऱ्यांची वानवा

By admin | Updated: November 14, 2015 03:04 IST

‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ असे म्हटले जात असले, तरी शहरातील काही मुले या उक्तीपासून वंचित असल्याचे चित्रही दिसते. आजही बालकामगार नावाची प्रथा अस्तित्वात असल्याचे

शीतल आल्हाट,  पिंपरी‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ असे म्हटले जात असले, तरी शहरातील काही मुले या उक्तीपासून वंचित असल्याचे चित्रही दिसते. आजही बालकामगार नावाची प्रथा अस्तित्वात असल्याचे पाहावयास मिळते. हॉटेलसारख्या ठिकाणी, वीटभट्टी, बांधकाम क्षेत्राच्या ठिकाणी, कचरा जमा करण्याच्या ठिकाणी लहान मुले काम करताना दिसतात. त्यामुळे या मुलांचा संपूर्ण विकास होण्याची शक्यता कमी असते. मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक अशा सर्वांगीण विकासासाठी समाजातील बालहक्कांसाठी लढणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची शहरात कमतरता आहे. शहरात अनेक ठिकाणी असंख्य बालके सामाजिक, आर्थिक, शारीरिकदृष्ट्या असुरक्षित आहेत. आर्थिक परिस्थिती योग्य नसल्यामुळे पोट भरण्यासाठी लहान मुलांना नाइलाजास्तव काम करणे अपरिहार्य असते. सध्या ठिकठिकाणी भिकारी म्हणून वावरणाऱ्या बालकामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रमुख रस्ते, चौक, बसथांबे, रेल्वेस्थानक अशा अनेक ठिकाणी लहान मुले भीक मागताना दिसतात. त्यांना खेळणी तसेच मोटारीतील शोभेच्या वस्तू विक्रीसाठी उन्हात उभे राहावे लागते, अशा माध्यमातून बालकांचे शोषण होत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बालकामगार मुक्तीसाठी विशेष कृती दलाची स्थापना केली गेली आहे. पण, हे दल बालकामगार असलेल्या ठिकाणी तुरळक प्रमाणात छापा मारतात. बाल न्याय अधिनियमानुसार बालकांना जगण्याचा अधिकार, सहभागतेचा अधिकार, विकासाचा अधिकार, सुरक्षतेचा अधिकार आहे. याचाच अर्थ त्यांना शोषणापासून मुक्ततेची कायद्यात तरतूद आहे. परंतु, तरतूद फक्त कागदावरच आहे. घरातील बिकट आर्थिक परिस्थितीमुळे बालकांना काम करावे लागते. हसण्या-खेळण्याच्या, शिक्षण घेण्याच्या वयात दोन वेळच्या जेवणासाठी या मुलांना परिस्थितीशी झुंज द्यावी लागते. बालकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाची असून, स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे मत औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचे आहे.