शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

अपंगांच्या पदरी उपेक्षा

By admin | Updated: April 24, 2017 04:42 IST

प्रत्येकाच्या हाताला काम आणि त्याचा योग्य दाम, या गोष्टी समाजात गरजेच्या ठरतात. परंतु गेल्या अनेक वर्षांत रोजगारनिर्मितीवर भर दिला जात

भोसरी : प्रत्येकाच्या हाताला काम आणि त्याचा योग्य दाम, या गोष्टी समाजात गरजेच्या ठरतात. परंतु गेल्या अनेक वर्षांत रोजगारनिर्मितीवर भर दिला जात असतानाही बेरोजगारीची समस्या मात्र कायम आहे. अपंग बांधवांना तर नेहमीच उपेक्षेचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. विविध सरकारी कार्यालये, सरकारी व खासगी दवाखाने, उद्याने, स्वच्छतागृहे अशा ठिकाणी अपंगांना जाण्यासाठी सुविधा होईल, अशी व्यवस्था करण्यात आली नसल्याने प्रत्येक वेळी अपंग बांधवांना इतरांकडे मदतीची याचना करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. तसेच शहरातील अपंगांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक केंद्र, तसेच विविध उपक्रम राबवण्यातही महापालिका प्रशासनाची उदासीनता दिसून येते. भोसरीतील दुय्यम उपनिबंधक कार्यालय, कर संकलन केंद्र, पोस्ट आॅफिस, पोलीस स्टेशन, सरकारी बँक, जीवन बिमा निगम, टेलिफोन कार्यालय, ई सेवा केंद्रे अशा विविध ठिकाणी अपंग बांधवांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये कामे घेऊन येणाऱ्या अपंग बांधवांच्या सोयीसाठी लिफ्ट किंवा रॅम्पची व्यवस्था असायलाच हवी, असा हायकोर्टाचा आदेश असला, तरी त्याची सर्रास पायमल्ली सुरू आहे. अनेक कार्यालयांमध्ये रॅम्प (सरकत्या जिन्यांची) व्यवस्थाच नसल्याने अपंगांना अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत पोहोचताना प्रत्येक पायरीवर अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते आहे. सरकारी योजनांची जेथून अंमलबजावणी होते, त्या सरकारी कार्यालयांमध्येच अपंग बांधवांप्रतिची अनास्था प्रकर्षाने पहावयास मिळते. सरकारी योजनांचे लाभ पदरात पाडून घेण्यासाठी इतरांप्रमाणेच अपंग बांधवांनाही सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागतात. सुदृढ व्यक्तीपेक्षा त्यांची परिस्थिती वेगळी असली, तरी त्याकडे डोळेझाक करून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची खंत अपंग बांधव व्यक्त करतात. अपंग बांधवांसाठी लिफ्ट किंवा रॅम्पची सोय असायलाच हवी असा सरकारचा १९९५ चा आदेश असला, तरी त्याची आजतागायत पायमल्ली सुरू आहे. (वार्ताहर) हौशी कलावंतांचे अनेक संघ आपली कला नव्याने प्रेक्षकांसमोर सादर करीत असतात. परंतु, असे असले तरी या सर्व पार्श्वभूमीवर एक गोष्ट मात्र खरी आहे की, शहरात अपंग मुला-मुलींंच्या सांस्कृतिक कलागुणांना वाव देणारे सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले नाही. मुळातच सहानुभूती नको असलेला आणि अंगी तुलनेने इतरांपेक्षा चांगले कलागुण असलेल्या या युवा वर्गाला सांस्कृतिक क्षेत्रात डावलण्यात आल्याची भावना अपंग कलाकार व्यक्त करतात.(वार्ताहर)