शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शहराचा कालबद्ध विकास करणार : गिरीश बापट

By admin | Updated: February 25, 2017 02:32 IST

महापालिका निवडणुकीत जनतेपुढे भाजपाने वचननामा मांडला. त्यानुसार पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी भाजपाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवून दिले आहे

पिंपरी : महापालिका निवडणुकीत जनतेपुढे भाजपाने वचननामा मांडला. त्यानुसार पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी भाजपाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवून दिले आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून शहराच्या विकासाचा कालबद्ध कार्यक्रम राबविणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी येथे शुक्रवारी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाला निर्विवाद बहुमत मिळाले. त्यापार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आझम पानसरे, लेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, प्रदेश सदस्या उमा खापरे, एकनाथ पवार यांच्यासह भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. ‘‘उद्योगनगरीत भाजपचे संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी ‘एक हजारी भाग’ ही पद्धत राबविली. संघटनेच्या जोरावर पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपाचे कमळ फुलले आहे. यापुढे एकही दिवस वाया न घालवता विकासकामे करण्यास सुरुवात करणार आहोत. विमानतळ, मेट्रो, रेडझोन, औद्योगिक प्रदर्शन, पीएमपी बस खरेदी करणे, लोणावळा-दौंड तिसरा रेल्वे मार्ग, रस्ते रुंद करणे, विकास आराखड्याची १०० टक्के अंमलबजावणी अशी विविध कामे नियोजनानुसार केली जातील. तीन महिन्यांतून एकदा विकासकामांचा आढावा घेतला जाईल. सर्वांना बरोबर घेऊन शहराचा विकास करणार आहे, असे बापट यांनी सांगितले. या वेळी लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेचा कारभार पारदर्शक करणार असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)