शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

दौंड बसस्थानक बनले अवैध धंद्यांचे आगार

By admin | Updated: May 12, 2017 04:44 IST

दौंड शहरापासून लांब, इमारतीची झालेली दुरवस्था, सुविधांची वानवा यांमुळे दौंड शहरातील बस स्थानक असुविधांचे आगार बनले आहे.

मनोहर बोडखे । लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : दौंड शहरापासून लांब, इमारतीची झालेली दुरवस्था, सुविधांची वानवा यांमुळे दौंड शहरातील बस स्थानक असुविधांचे आगार बनले आहे. रात्रीच्या वेळी तळीरामांनी या स्थानकाला आपला अड्डा बनवला आहे. याबरोबरच इतर अवैध प्रकार स्थानक परिसरात होत असल्याने या ठिकाणी रात्रीचे येणे प्रवासी टाळतात. या प्रकारामुळे दौंडेचे स्थानक हे असुविधांचे केंद्र बनले आहे. दौंड बस स्थानक हे शहरापासून दूर आहे. यामुळे एवढ्या लांब येण्यायेवजी रेल्वेने प्रवास करण्यास प्रवासी प्राधान्य देतात. या स्थानकात अनेक गैरसोयी तसेच पायाभूत सुविधांची वानवा आहे. देखभाल-दुरुस्तीअभावी इमारतीला बकाल स्वरूप आले आहे. रात्रीच्या वेळी तळीरामांनी या स्थानकाला आपला अड्डा बनविल्याने या परिसरात फिरणे प्रवासी टाळतात. बस स्थानकातील व्यापारी गाळे अनेक वर्षांपासून बंद आहेत. प्रवाशांना बसण्यासाठी बांधलेली सिमेंटची आसने तुटलेली आहेत. यामुळे प्रवाशांना उभे राहूनच बसगाड्यांची वाट पाहावी लागते. या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहात कायम दुर्गंधी असते. यामुळे या स्वच्छतागृहात न जाताच उघड्यावरच प्रवासी विधी उरकतात. सर्वाधिक गैरसोय होते ती महिला प्रवाशांची. स्थानकातील अस्वच्छतेमुळे डासांची पैदास वाढली आहे. भरदिवसा त्यांचा उपद्रव प्रवाशांना सहन करावा लागत असल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घाणीच्या साम्राज्यातच एसटी कंट्रोलरचे कार्यालय आहे. या अस्वच्छतेतच एसटी कंट्रोलरचे कामकाज चालते. स्थानकात चुकून तुरळक बसगाड्या येतात; मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या बाहेरूनच निघून जातात. तालुक्याअंतर्गत बससेवा आणि दोन ते तीन लांब पल्ल्याच्या गाड्या, की ज्या दौंड डेपोच्या आहेत, त्यांचीच वर्दळ स्थानकात असते. बस स्थानक दूर असल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या नगरमोरी चौकात थांबतात. त्यामुळे प्रवाशांना गावातून नगरमोरी चौकात दोन किलोमीटर जावे लागते. परिणामी, प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. काही गाड्या रेल्वे स्थानक परिसरात येतात; मात्र त्या तालुक्याअंतर्गत असतात. स्थानकाची जुनी इमारात पाडून नव्याने स्थानक उभारण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.