शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

रसायनमिश्रित सांडपाणी थेट नदीत

By admin | Updated: April 25, 2017 04:09 IST

संत तुकाराम महाराजांच्या वैकुठगमन सोहळ्यात चिखली येथे महाराजांचे टाळ विसावले त्यामुळे चिखली गावाला टाळगाव चिखली

शशिकांत जाधव / तळवडेसंत तुकाराम महाराजांच्या वैकुठगमन सोहळ्यात चिखली येथे महाराजांचे टाळ विसावले त्यामुळे चिखली गावाला टाळगाव चिखली असे बिरुद मिळाले. याच चिखली गावातून देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रांना जोडणारी आणि वारकरी संप्रदायात प्रतिगंगा म्हणून ओळखली जाणारी इंद्रायणी नदी वाहते. मात्र, या पवित्र इंद्रायणीला या भागात प्रदूषणाचा विळखा पडला असल्याने गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.येथे इंद्रायणी नदीवर असलेल्या स्मशानभूमीच्या जवळून एक मोरी बनवण्यात आली आहे. या मोरीमधून सातत्याने गटाराचे, दुर्गंधीयुक्त पाणी नदीपात्रात मिसळत असते. या गटाराच्या पाण्यामुळे इंद्रायणीच्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. येथील स्मशानभूमीच्या घाटावर असलेल्या पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे.सर्वच नद्यांच्या प्रदूषण होण्यास कारणीभूत असलेली जलपर्णी येथेही वाढली आहे. पात्रात काळ्या रंगाचे, दुर्गंधीयुक्त प्रदूषित असलेल्या पाण्यात येथे राहणारे परप्रांतीय मासेमारी करत असतात. प्रदूषित पाण्यातील मासे खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.इंद्रायणीचे प्रदूषण रोखणे अतिशय गरजेचे आहे़ यासाठी येथील नागरिक, सामाजिक संस्था, महापालिकेचा पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याकडून उपाययोजना करणे तसेच प्रदूषणास जबाबदार घटकांवर दंडात्मक कारवाई झाल्यास प्रदूषणास आळा बसेल. इंद्रायणीला पुन्हा एकदा पूर्वी चे निर्मळ वैभव प्राप्त होईल, असे पर्यावरणप्रेमी नागरिक बोलतात.