शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

रसायनमिश्रित सांडपाणी थेट नदीत

By admin | Updated: April 25, 2017 04:09 IST

संत तुकाराम महाराजांच्या वैकुठगमन सोहळ्यात चिखली येथे महाराजांचे टाळ विसावले त्यामुळे चिखली गावाला टाळगाव चिखली

शशिकांत जाधव / तळवडेसंत तुकाराम महाराजांच्या वैकुठगमन सोहळ्यात चिखली येथे महाराजांचे टाळ विसावले त्यामुळे चिखली गावाला टाळगाव चिखली असे बिरुद मिळाले. याच चिखली गावातून देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रांना जोडणारी आणि वारकरी संप्रदायात प्रतिगंगा म्हणून ओळखली जाणारी इंद्रायणी नदी वाहते. मात्र, या पवित्र इंद्रायणीला या भागात प्रदूषणाचा विळखा पडला असल्याने गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.येथे इंद्रायणी नदीवर असलेल्या स्मशानभूमीच्या जवळून एक मोरी बनवण्यात आली आहे. या मोरीमधून सातत्याने गटाराचे, दुर्गंधीयुक्त पाणी नदीपात्रात मिसळत असते. या गटाराच्या पाण्यामुळे इंद्रायणीच्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. येथील स्मशानभूमीच्या घाटावर असलेल्या पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे.सर्वच नद्यांच्या प्रदूषण होण्यास कारणीभूत असलेली जलपर्णी येथेही वाढली आहे. पात्रात काळ्या रंगाचे, दुर्गंधीयुक्त प्रदूषित असलेल्या पाण्यात येथे राहणारे परप्रांतीय मासेमारी करत असतात. प्रदूषित पाण्यातील मासे खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.इंद्रायणीचे प्रदूषण रोखणे अतिशय गरजेचे आहे़ यासाठी येथील नागरिक, सामाजिक संस्था, महापालिकेचा पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याकडून उपाययोजना करणे तसेच प्रदूषणास जबाबदार घटकांवर दंडात्मक कारवाई झाल्यास प्रदूषणास आळा बसेल. इंद्रायणीला पुन्हा एकदा पूर्वी चे निर्मळ वैभव प्राप्त होईल, असे पर्यावरणप्रेमी नागरिक बोलतात.