शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रसायनमिश्रित सांडपाणी पवनेत

By admin | Updated: May 12, 2017 05:04 IST

पवना नदीच्या स्वच्छ पाण्यास शिरगाव, सोमाटणे परिसरास उग्र वासाने ग्रासले आहे. स्वच्छ अशा पाण्याला काळा रंग चढल्याने नदीला

लोकमत न्यूज नेटवर्कशिरगाव : पवना नदीच्या स्वच्छ पाण्यास शिरगाव, सोमाटणे परिसरास उग्र वासाने ग्रासले आहे. स्वच्छ अशा पाण्याला काळा रंग चढल्याने नदीला ग्रहण लागल्यासारखे दिसत आहे. ठिकठिकाणी गावांमधील सांडपाणी नदीत सोडल्याने रसायनयुक्त पाण्याने नदीच्या पाण्याचा मूळ रंग बदलून काळसर रंग चढला आहे. पवन मावळातील धामणे, सोमाटणे, शिरगाव, गोदुंब्रे, साळुंंब्रे, दारुंब्रे, गहुंजे आदी नदी काठांवरील गावांमधील सांडपाणी हे थेट नदी पत्रात मिसळत आहे. याच परिसरात असलेला साखर कारखान्याचे पाणी दारुंब्रे ओढ्यात सोडले जाते. हे पाणी काही प्रमाणात शेतकरी शेतीकरिता वापरतात. परंतु काही पाणी हे थेट नदीत मिसळत असल्याने नदीच्या प्रदूषणात अधिकच भर पडत आहे. गावोगावची धार्मिक स्थळे, मंदिरे यांचे सांडपाणीही नदीपात्रात जात असल्याने प्रदूषण वाढत आहे. उर्से परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदी पात्रात पोहचत असल्याने येथील पाण्यात असणारे रसायन नदी पात्रातील पाण्यात मिसळले जात असल्याने धामणे, सोमाटणे, शिरगाव, भागातील नदीच्या पाण्याचा उग्र रसायनाचा वास येत आहे. सोमाटणे परिसरात नागरीकरण वाढत असून उद्योग, दवाखाने, हॉटेल्सची संख्या वाढत आहे. काही हॉटेल व्यावसायिक उरलेले शिळे अन्न प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरून नदी पात्रात टाकत आहेत. त्या तीरावरील झाडांमध्ये अडकून पडत आहेत. नदी पात्रात अनेक धार्मिक विधी पार पडले जातात तेव्हा प्लॅस्टिक कॅरिबॅग, पत्रावळ्या आदी नदी पात्रात टाकल्या जात आहेत. त्यामुळे हे सर्व पाण्याबरोबर वाहत न जाता कोठेतरी अडकून राहते त्यामुळे नदी प्रवाहास अडथळा निर्माण होत असून नदीपात्राचे विद्रुपीकरण होत आहे. दूषित पाण्यामुळे नदीच्या कडेला जलपर्णीचा विळखा वाढत आहे.