शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

लाभार्थी गावांत होतेय कृत्रिम पाणीटंचाई

By admin | Updated: April 2, 2017 03:00 IST

पिलाणवाडी जलाशयावरून असणा-या शिवरी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेवरून सध्या उन्हाळी परीस्थिती मुळेसर्वच लाभार्थी खळद

खळद : पिलाणवाडी जलाशयावरून असणा-या शिवरी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेवरून सध्या उन्हाळी परीस्थिती मुळेसर्वच लाभार्थी खळद, शिवरी, वाळुंज, तक्रारवाडी, साकुर्डेया गावांना तसेच यांच्या वाडयावस्त्यांना पाणी पुरवठा होत असुन नागरीकांना जवळपास दहा दहा दिवस पाणी मिळत नाही यामुळे या भागातील नागरीकांचे पाण्याचे मोेठे हाल होत असतानाच येथील फिल्टर प्लांटवरून रोज पाच टँकरने दहा ते पंधरा फे-या होत असल्यानेया योजनेवर अधिक ताण येऊन नागरीकांचे पाण्याचे प्रचंढ हाल होत असल्याचेपाहावयास मिळत आहे.येथे योजना उशाला आणि कोरड घशाला अशी परीस्थिती सध्या झाली असुन घराशेजारून पाण्याची लाईन गेली तर दारातुन रोज पाण्याचेटँकर भरून जात असल्याचेदिसत आहेपण आपली हक्काची योजना असतानाही घरात हंडाभर पाणी नाही यामुळेशासनानेतयार केलेल्या या कृत्रीम पाणी टंचाईला नागरीक सामोरे जात आहेत. याबाबत आज सकाळी शिवरी येथे संतप्त नागरीकांनी पाण्याचे टँकर आडवून याचा जोरदार निषेध केला व परत टँकर न आणण्याची विनंती केली अन्यथा सर्व गावातील नागरीक महिला,पुरूष,युवक ,जनावरांसहीत रस्त्यावर उतरतील असा शासनाला खणखणीत इशारा दिला.य्शिवरी येथील फिल्टर प्लांटवर मात्र प्रत्याक्षात ४ ते५ हॉर्सपॉवरच्या पंपा इतकेच पाणी येते तर ज्यावेळी ही योजना झाली. त्यावेळची लोकसंख्या व आत्ताची लोकसंख्या यात तिपटीनेवाढ झाली आहेयामुळे हे पाणी या गावांना पुरविणेच या कर्मचा-यांना जिकरीचे होत आहे.तहसीलदारांनी पाहणी करावीसाहेब इतर गावातील नागरीकांना पाणी मिळावेयांस आमचा विरोध नाही पण योजना आमची असताना आम्हालाच पाणी मिळत नाही ,आमचेच पाण्याचे हाल होत आहेत मंग आपण हेटँकर येथे च का पाठवता ? ४ तारखेला आमच्या या भागातील कावडी शिखर शिंगणापूरला पायी वारीसाठी प्रस्थान करणार आहेत यावेळी नोकरी व्यवसायानिमित्तानेबाहेर गेलेलेहजारो नागरीक तसेच मोठयाप्रमाणावर नातेवाईकही येणार असल्यानेयावेळी आम्ही पाण्याचेकाय करायचे? असा संतप्त सवाल करीत आपण येथे येऊन परीस्थितीची पाहणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली. पिलाणवाडी जलाशयातील उपसा बंद कराया योजनेला पाणी पुरवठा करणा-या पिलाणवाडी जलाशयातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत चालला असुन येथील पाणी हेआता पिण्यासाठीच राखीव होणे गरजेचेअसताना येथे राजरोस पणे शेतीसाठी पाणी उपसा होत असुन याचीही प्रशासनानेतातडीनेदखल घेत हा पाणी उपसा बंद करावा अन्यथा या पुढील काळात ऐन उन्हाळयात ,यात्रांच्या मोसमात तीव्र पाणी टंचाईला सामोरेजावेलागेल अशी भीतीही नागरीक व्यक्त करीत आहेत.