शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

पाणीप्रश्नावरून प्रशासन धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 05:12 IST

महापालिका परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचे पडसाद स्थायी समिती सभेतही उमटले. नगरसेवकांची अधिकाºयांवर प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरले.

पिंपरी : महापालिका परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचे पडसाद स्थायी समिती सभेतही उमटले. नगरसेवकांची अधिकाºयांवर प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरले. पाणीपुरवठा विस्कळीत होण्यास प्रशासन जबाबदार आहे. लोकप्रतिनिधींकडून तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून कचरा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सत्ताधारी नेते केवळ अधिकाºयांच्या आणि पदाधिकाºयांच्या बैठका घेण्यापलीकडे काहीही ठोस निर्णय घेत नाही. महापौर नितीन काळजे यांनी पाणी प्रश्न सुटला नाही, तर अधिकाºयांवर कारवाई करू असा इशारा एक महिन्यांपूर्वी दिला होता. भाजपाची सत्ता येण्यापूर्वी पाणीपुरवठा सुरळीत होता. एकवेळ पाणी असतानाही पूर्ण दाबाने पाणी मिळत होते. मग, पिण्याच्या पाण्याची कोंडी कोणी केली, असा सवालही काही नगरसेवकांनी उपस्थितकेला. तर काही सदस्यांनी अधिकारी ऐकत नाहीत, अशी हतबलताही दाखविली होती. तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांबाबत कबुली दिली होती. पदाधिकाºयांनी अधिकाºयांसमवेत बैठका घेऊनही प्रश्न सुटलेला नसल्याची नाराजी स्थायी समितीच्या सभेत व्यक्त केली.स्थायीच्या अध्यक्ष सीमा सावळेंसह सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आशा शेंडगे-धायगुडे म्हणाल्या, ‘‘पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. काही महिन्यांपूर्वी नव्हता. लोक म्हणतात, भाजपाची सत्ता आली आणि पाणी गेले. ही बाब गंभीर आहे. अधिकारी नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविताहेत काय? याची चौकशी करायला हवी.’’ या चर्चेत राजू मिसाळ, वैशाली काळभोर, उषा मुंढे, मोरेश्वर भोंडवे, अमीत गावडे, मोना कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. सर्वांनी आपापल्या भागातील तक्रारी सांगितल्या.टंचाईचे खापर सत्ताधाºयांवरअधिकाºयांमुळेच पाणीटंचाई होत आहे़ त्याचे खापर सत्ताधारी आणि नगरसेवकांवर फुटत आहे. याची चौकशी करण्याची गरज आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाण्याची गरज आहे. नागरिकांना वेठीस धरणाºया अधिकारी आणि कर्मचाºयांची गय केली जाऊ नये, अशीही मागणी सदस्यांनी केली.पिण्याच्या पाण्याचे भविष्यकालीन नियोजन लक्षात घेता भामा आसखेड, आंद्रा धरणातून पाणी आणण्यास गती मिळणार आहे. या विषयी सल्लागार नियुक्तीचा विषय मंजूर केला आहे. या संदर्भातील डीपीआर तयार झालेला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू होणार आहे. धरणातून थेट पाणी योजना राबविताना वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा सुरू आहे. नवलाख उंबरे येथे टाकी उभारून तेथून चिखली येथील जलउपसा केंद्रात पाणी आणू शकतो. तसेच देहूतही बंधारा बांधून तेथून पाणी आणता येईल. या सर्व शक्यतावंर डीपीआरनुसार काम सुरू आहे.- रवींद्र दुधेकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभागपिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाणी वितरण पद्धतीत काही दोष आहेत. ते दूर करणे गरजेचे आहे. ठेकेदारी पद्धतीने मजूर पुरविणाºया संस्थांचे काम बंद करून घंटागाडी कामगारांप्रमाणे व्हॉल्व्ह सोडण्याचे काम करणाºया मजुरांना एकरकमी पगारावर सेवेत घ्यावे, असा विचार पुढे आला आहे. त्यामुळे पाण्याच्या समस्या काही प्रमाणात सुटतील अशी अपेक्षा आहे. सर्वच भागांतून पिण्याच्या पाण्याच्या विषयी तक्रारी आहेत. सदस्यांसह नागरिकही तक्रारी करीत आहेत, त्यात तथ्य आहे. या विषयी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.- सीमा सावळे, अध्यक्षा, स्थायी समिती

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड