शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नावरून प्रशासन धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 05:12 IST

महापालिका परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचे पडसाद स्थायी समिती सभेतही उमटले. नगरसेवकांची अधिकाºयांवर प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरले.

पिंपरी : महापालिका परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचे पडसाद स्थायी समिती सभेतही उमटले. नगरसेवकांची अधिकाºयांवर प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरले. पाणीपुरवठा विस्कळीत होण्यास प्रशासन जबाबदार आहे. लोकप्रतिनिधींकडून तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून कचरा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सत्ताधारी नेते केवळ अधिकाºयांच्या आणि पदाधिकाºयांच्या बैठका घेण्यापलीकडे काहीही ठोस निर्णय घेत नाही. महापौर नितीन काळजे यांनी पाणी प्रश्न सुटला नाही, तर अधिकाºयांवर कारवाई करू असा इशारा एक महिन्यांपूर्वी दिला होता. भाजपाची सत्ता येण्यापूर्वी पाणीपुरवठा सुरळीत होता. एकवेळ पाणी असतानाही पूर्ण दाबाने पाणी मिळत होते. मग, पिण्याच्या पाण्याची कोंडी कोणी केली, असा सवालही काही नगरसेवकांनी उपस्थितकेला. तर काही सदस्यांनी अधिकारी ऐकत नाहीत, अशी हतबलताही दाखविली होती. तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांबाबत कबुली दिली होती. पदाधिकाºयांनी अधिकाºयांसमवेत बैठका घेऊनही प्रश्न सुटलेला नसल्याची नाराजी स्थायी समितीच्या सभेत व्यक्त केली.स्थायीच्या अध्यक्ष सीमा सावळेंसह सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आशा शेंडगे-धायगुडे म्हणाल्या, ‘‘पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. काही महिन्यांपूर्वी नव्हता. लोक म्हणतात, भाजपाची सत्ता आली आणि पाणी गेले. ही बाब गंभीर आहे. अधिकारी नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविताहेत काय? याची चौकशी करायला हवी.’’ या चर्चेत राजू मिसाळ, वैशाली काळभोर, उषा मुंढे, मोरेश्वर भोंडवे, अमीत गावडे, मोना कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. सर्वांनी आपापल्या भागातील तक्रारी सांगितल्या.टंचाईचे खापर सत्ताधाºयांवरअधिकाºयांमुळेच पाणीटंचाई होत आहे़ त्याचे खापर सत्ताधारी आणि नगरसेवकांवर फुटत आहे. याची चौकशी करण्याची गरज आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाण्याची गरज आहे. नागरिकांना वेठीस धरणाºया अधिकारी आणि कर्मचाºयांची गय केली जाऊ नये, अशीही मागणी सदस्यांनी केली.पिण्याच्या पाण्याचे भविष्यकालीन नियोजन लक्षात घेता भामा आसखेड, आंद्रा धरणातून पाणी आणण्यास गती मिळणार आहे. या विषयी सल्लागार नियुक्तीचा विषय मंजूर केला आहे. या संदर्भातील डीपीआर तयार झालेला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू होणार आहे. धरणातून थेट पाणी योजना राबविताना वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा सुरू आहे. नवलाख उंबरे येथे टाकी उभारून तेथून चिखली येथील जलउपसा केंद्रात पाणी आणू शकतो. तसेच देहूतही बंधारा बांधून तेथून पाणी आणता येईल. या सर्व शक्यतावंर डीपीआरनुसार काम सुरू आहे.- रवींद्र दुधेकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभागपिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाणी वितरण पद्धतीत काही दोष आहेत. ते दूर करणे गरजेचे आहे. ठेकेदारी पद्धतीने मजूर पुरविणाºया संस्थांचे काम बंद करून घंटागाडी कामगारांप्रमाणे व्हॉल्व्ह सोडण्याचे काम करणाºया मजुरांना एकरकमी पगारावर सेवेत घ्यावे, असा विचार पुढे आला आहे. त्यामुळे पाण्याच्या समस्या काही प्रमाणात सुटतील अशी अपेक्षा आहे. सर्वच भागांतून पिण्याच्या पाण्याच्या विषयी तक्रारी आहेत. सदस्यांसह नागरिकही तक्रारी करीत आहेत, त्यात तथ्य आहे. या विषयी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.- सीमा सावळे, अध्यक्षा, स्थायी समिती

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड