शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

शहरात गर्भपात प्रमाण चिंताजनक

By admin | Updated: March 27, 2016 02:54 IST

शहरात गर्भपाताचे प्रमाण वाढत असून, ही बाब चिंताजनक बनली आहे. वर्षाला सुमारे १३ हजार गर्भपात होत आहेत. महिलांच्या आरोग्यासह गर्भपात करण्यासाठीच्या कारणांकडे गांभीर्याने

पिंपरी : शहरात गर्भपाताचे प्रमाण वाढत असून, ही बाब चिंताजनक बनली आहे. वर्षाला सुमारे १३ हजार गर्भपात होत आहेत. महिलांच्या आरोग्यासह गर्भपात करण्यासाठीच्या कारणांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे. गर्भपात करताना सबळ कारण सादर करणे आवश्यक असते. बाळाला धोका असणे, आईला धोका असणे, गर्भाशयाचा त्रास, लैंगिक अत्याचाराच्या घटनेतून झालेली गर्भधारणा अशावेळी वीस आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येऊ शकतो. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. महापालिका रुग्णालयासह शहरात इतरही अधिकृत गर्भपात केंद्र आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या वर्षभरात १३ हजार गर्भपाताची प्रकरणे घडली आहेत. गर्भपाताचे प्रमाण कमी होण्यासाठी महिलांच्या आरोग्यासह जनजागृतीकडेदेखील लक्ष देणे गरजेचे बनले आहे. गर्भवती मातेचा आहार, व्यायाम, मार्गदर्शन यासह उपचारही महत्त्वाचे आहेत. गर्भलिंग चाचणी करणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. तरीही बेकायदारीत्या बाळाची लिंगचाचणी करून गर्भपात करण्याचे प्रकार घडत आहेत. वंशाचा दिवा हवा या अपेक्षेने गर्भपात केला जात असून, यामुळे एक कळी उमलण्याआधीच कोमेजून जाते, याचा गांभीर्याने विचार करायला हवा. गर्भपाताचे प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती आणि समाजप्रबोधन गरजेचे आहे. मुलाप्रमाणे मुलगीदेखील वंशाचा दिवा आहे. या साध्या गोष्टी समजल्यास गर्भपातासारखे प्रकार थांबण्यास मदत होऊ शकेल, असे मत व्यक्त केले जात आहे.(प्रतिनिधी)पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत २०१३-१४ या आर्थिक वर्षात १३ हजार ६२० गर्भपात करण्यात आले, तर २०१४-१५ या आर्थिक वर्षात १३ हजार ३६३ गर्भपात झाले. दोन वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण तीनशेने घटले असले, तरी वर्षातील एकूण आकडा मोठा आहे. दरम्यान, या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतही ८ हजार ७०९ गर्भपात झाले. कायद्याने अथवा बेकायदारीत्या होत असलेले गर्भपाताचे प्रकार चिंताजनक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. कायदेशीररीत्या गर्भपात करतानाही त्याबाबतची रीतसर परवानगी हवी असते. त्यातच अधिकृत केंद्रातच गर्भपात करणे बंधनकारक आहे. नियमानुसार गर्भपात करताना तो कोठे करणार आहे, कोण करणार आहे, कशासाठी करणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती सादर करणे आवश्यक असते. त्यानंतरच गर्भपात करण्यास परवानगी मिळते. परवानगीशिवाय गर्भपात केल्यास तीन ते पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.